अकोला शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात अवघा १७.६१ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने, महानगरपालिकेने शहरात तात्काळ पाणीकपात लागू केली आहे. आता अकोल्यात चार दिवसांआड ऐवजी पाच दिवसांआड, म्हणजेच थेट सहाव्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.
अकोला शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात अवघा १७.६१ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने, महानगरपालिकेने शहरात तात्काळ पाणीकपात लागू केली आहे. आता अकोल्यात चार दिवसांआड ऐवजी पाच दिवसांआड, म्हणजेच थेट सहाव्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.






