उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. प्रत्येकवेळी त्यांनी केलेली विधाने राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहेत. मात्र त्यांचा हा स्वभाव त्यांना कधींना कधी अडचणीत आणू शकतो. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे इंदापूरच्या सभेत अजित पवार यांनी केले वक्तव्य. अजित पवार म्हणाले, आम्ही तुम्हाला निधी देतो, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा. तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या.
अजित पवार म्हणाले, आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामांसाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… ,म्हणजे मला निधी देण्यासाठी बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल.
कार्यकर्त्यांना आदेश द्याचे नसतात, त्यांना सांभाळावं लागत- अजित पवार
जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा तेव्हा मी काम केली आहेत. मला काम करायला आवडत.मला आदेश देण्याची सवय झाली आहे, म्हणून मी अधिकाऱ्यांना आदेश देतो. पण आपल्या कार्यकर्त्यांना आदेश द्याचा नसतो. कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरीच बसवतील. कार्यकर्त्यांशी नीट बोलावं लागत त्यांना सांभाळावे लागते,असे अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी ४० वर्षांपासून उमेदवाराला ओळखतो आहे. मी ४० वर्षांपासून ओळखते ते कुठेही ढवळाढवळ करत नाहीत. ते तुम्हाला बाहेरचे वाटणार नाहीत. ते तुम्हाला आपले वाटतील. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करत असताना नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर ठेवून मतदान करावे.
मी शब्दाचा पक्का आहे – अजित पवार
पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या २० ते २५ वर्षांचा विचार करून काम करू. माझ्या बारामतीमध्ये सुद्धा ३८२ कोटी एवढी मंजुरी देऊ शकलो नाही पण इंदापूरमध्ये दिली. मी शब्दाचा पक्का आहे. मी महिन्यातून एक दिवस कामाचा आढावा घेण्यासाठी काढेन. तसेच आम्ही जो उमेदवार दिला आहे तो देखील काम करेल, असे अजित पवार म्हणाले.