"राजकारण लई वंगाळ झालंय!" विलीनीकरणाच्या दाव्यावरून 'सामना'तून भाजपवर घणाघाती टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारण एका नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अवघ्या चार दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, या सगळ्या गदारोळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरण्यासाठी अजित पवार सकारात्मक होते, असा दावा करण्यात आला अजित पवार आणि आपल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विलीनीकरणासाठी चर्चा सुरू होत्या.
येत्या १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा केली जाणार होती. असेही सांगण्यात आले. तर, अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटात विलीन करायची असती तर त्यांनी आधी आमच्याशी चर्चा केली असती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला.या सगळ्या घडामोडींवर दैनिक सामनातून पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.
“अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता. त्यातूनच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’ आहे. अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबात व राज्याच्या घडामोडीत गुंता वाढला. गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे. पुढचे पुढे पाहू. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. त्यांचे अभिनंदन! सुतक काय, येते आणि जाते. राजकारण थांबवून कसे चालेल? राजकारण खरोखरच लई वंगाळ झाले आहे.” अशी टिका करण्यात आली आहे.






