Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही… डॉक्टरांनी दिला सल्ला

चुकीची जीवनशैली, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो. हा आजार पूर्णपणे बरा होत नसला तरी योग्य आहार आणि सवयींच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 06, 2026 | 11:46 AM
प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही... डॉक्टरांनी दिला सल्ला

प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही... डॉक्टरांनी दिला सल्ला

Follow Us
Close
Follow Us:
  • काही नैसर्गिक पदार्थ रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात.
  • तज्ञांच्या मते, योग्य आहार निवडल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवणे सोपे होते.
  • मात्र याचे सेवन कसे करावे याबाबतही आरोग्य तज्ञ महत्त्वाची सूचना देतात.
चुकीची जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे गंभार आजाराचा धोका दुपटीने वाढला आहे. पूर्वीच्या काळी क्वचित होणारे आजार आता फार सामान्य झाले आहेत. यातीलच एक गंभीर आजार म्हणजे मधुमेह. हा एक असा आजार आहे जो कधीही बरा होऊ शकत नाही. पण याची तीव्रता कमी करता येऊ शकते. मधुमेह रुग्णाचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे शरीरातील साखर नियंत्रणात आणणे. यासाठी अनेक पत्थे पाळण्याचा सल्ला दिला जातो. पण आज आम्ही तुम्हाला या लेखात काही अशा फळांची नावे सांगणार आहोत जी मधुमेह नियंत्रणात करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय ठरतात.

पायांमध्ये सतत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा!

निरोगी राहण्यासाठी फळे खाणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येक फळाचे स्वतःचे वेगळे गुणधर्म असतात आणि त्यात वेगवेगळे पोषक घटक असतात. अशी दोन फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी विशेषतः फायदेशीर मानली जातात. मधुमेहाला जर तुम्हाला नियंत्रणात करायचे असेल तर आजपासूनच ही दोन फळे खायला सुरवात करा. मुख्य म्हणजे, स्वत: डाॅक्टर रुग्णांना ही फळे खाण्याची शिफारस करतात. चला ही कोणती फळे आहेत आणि त्यांचे फायदे काय याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मोसंबी

डॉ. प्रमोद त्रिपाठी म्हणतात की प्रत्येक मधुमेहाच्या रुग्णाने आपल्या आहारात मोसंबीचे सेवन करायला हवे. फायबर आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध मोसंबी मधुमेहाच्या आजारावर एका औषधासारखे काम करते. खरंतर मोसंबी हे डायबीटिजच्या ॲकार्बोज औषधासारखे काम करते. ते तुमच्या आतड्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करून खाल्ल्यानंतर साखरेचे प्रमाण कमी करते.

संत्री

संत्र्याचे सेवन देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक चांगला पर्याय ठरते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) ५० ते ५२ च्या दरम्यान असतो. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि हेस्पेरिडिन नावाच्या वनस्पती-आधारित फ्लेव्होनॉइडचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. डॉ. प्रमोद म्हणतात की, संत्र्याचे सेवन मेटफॉर्मिन या औषधासारखाच प्रभाव असतो. ते शरीरातील रक्तवाहिन्यांवर दाहक-विरोधी परिणाम करते. यामुळे यकृतातून साखरेचे उत्सर्जन कमी होते.

भद्रकालीचे अद्भुत मंदिर जिथे देवीच्या डोळ्यात लावला होता कोहिनूर हिरा, जाणून घ्या इंग्रजांपर्यंत कसा पोहचला…

संत्र्याचा-मोसंबीचा रस अधिक फायदेशीर की फळ?

अनेकांना प्रश्न पडतो की फळाला कापून त्याचे सेवन करावे की त्याचा रस बनवून मग त्याचे सेवन करावे. आरोग्य तज्ञांच्या मते, संपूर्ण फळे खाणे नेहमीच चांगले असते. जेव्हा आपण फळाचा रस बनवून त्याचे सेवन करतो तेव्हा फळातील सर्व फायबर काढून टाकले जाते. हे फायबर साखरेचे शोषण कमी करते. रसात फक्त साखर राहते, ज्यामुळे साखरेची पातळी वाढते. तर जेव्हा तुम्ही संपूर्ण फळे खाता तेव्हा शरीराला फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे संतुलित पद्धतीने मिळतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील संतुलित राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Every diabetic patient should eat these 2 fruits lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • diabetes
  • healthy fruits
  • lifestyle news

संबंधित बातम्या

पायांमध्ये सतत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा!
1

पायांमध्ये सतत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा!

Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?
2

Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?

Grapes Benefits: आंबट गोड द्राक्ष खाताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, जाणून घ्या कधी आणि किती प्रमाणात करावे द्राक्षांचे सेवन
3

Grapes Benefits: आंबट गोड द्राक्ष खाताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, जाणून घ्या कधी आणि किती प्रमाणात करावे द्राक्षांचे सेवन

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ
4

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.