
चिकन बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? तज्ञांनी सांगितलं खरं सत्य
नोएडा कैलाश हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उमा शंकर शर्मा यांनी सांगितले की, कधीकधी खराब झालेले कलिंगड किंवा खराब झालेली बिर्याणी खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. तथापि, बिर्याणीनंतर लगेच टरबूज खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होईलच याची १००% खात्री नाही. बिर्याणीनंतर लगेचच कलिंगड खाल्ल्याने पोट बिघडू शकते. तसेच यामुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ शकतो.
यथार्थ हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. कपिल शर्मा यांनी सांगितले की, बिर्याणी आणि कलिंगड दोन्हीही पचवण्याची क्रिया काहीशी वेगळी असते. जास्त प्रमाणात जर यांचे सेवन केले जर यामुळे गॅस, पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तथापि, बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो हा दावा खोटा असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. हे दोन्ही पदार्थ खाल्ल्याने कोणतीही रासायनिक प्रक्रिया होत नाही जी मृत्यू घडवून आणेल. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने जर कुणाचा मृत्यू होत असेल तर त्यामागे लिव्हर शॉक, अन्न विषबाधा किंवा ॲलर्जी सारखी इतर कारणे कारणीभूत ठरु शकतात. याशिवाय खराब झालेले अन्न खाल्ल्यानेही ही समस्या निर्माण होऊ शकते.
फोर्टिस हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. भानू मिश्रा यांनी सांगितले की, कलिंगड हा एक हलका पदार्थ मानला जातो. दुसरीकडे बिर्याणी हा एक जड पदार्थ मानला जातो. बिर्याणी पचायला शरीराला ४ ते ५ तास लागतात, तर टरबूज पचायला २० ते ३० मिनिटे लागतात. यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पोट बिघडू शकते. परंतु या फूड काॅम्बिनेशनमुळे मृत्यू होत नाही. बिर्याणी खाल्ल्याच्या ४-५ तासांनंतर कलिंगडाचे सेवन करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. पण कलिंगडाचे हे सेवन नेहमी मर्यादित प्रमाणातच करा अन्यथा यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
या गोष्टी लक्षात ठेवा