
लठ्ठपणाची वाढती समस्या (फोटो सौजन्य - iStock)
शहरी भारतात लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे आणि तो मोठा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनत आहे. लहान मुलांपासून ते प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण याचा सामना करत आहेत. जलद जीवनशैली, दीर्घ कामाचे तास आणि जास्त कॅलरी असलेले अन्न सहज उपलब्ध असल्याने निरोगी वजन राखणे कठीण झाले आहे. अनेकांना वाढलेले वजन कमी करणे आव्हानात्मक वाटते. लठ्ठपणा फक्त दिसण्यापुरता मर्यादित नसून, तो मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवतो. त्यामुळे वजन कमी करणे कठीण का होत आहे आणि त्यावर उपाय काय हे समजून घेणे आवश्यक आहे. डॉ. शशांक शाह, बॅरिएट्रिक सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
Obesity Issue: जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी का गरजेची, शरीर आतून पोखरतंय; गंभीर परिणाम
वजन कमी करणे कठीण का होत आहे?
शहरातील अनेक लोक दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करतात, वाहतुकीत वेळ घालवतात आणि शारीरिक हालचाल कमी असते. त्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि चरबी साचू लागते. बसून राहण्याची सवय वजन कमी होण्यास अडथळा ठरते.
अयोग्य आहार ही आणखी एक मोठी समस्या आहे. अनेकजण प्रोसेस्ड, पॅकेज्ड आणि हॉटेलमधील अन्न खातात, ज्यामध्ये साखर, अनारोग्यदायी फॅट्स आणि मीठ जास्त असते. यामुळे शरीरात अनावश्यक कॅलरीज वाढतात, पण पोषण मिळत नाही. वारंवार खाणे आणि अनियमित जेवणाच्या वेळेमुळेही मेटाबॉलिझम बिघडतो आणि वजन वाढते. तणाव हा देखील वजन वाढण्यामागील महत्त्वाचा घटक आहे. कामाचा ताण, आर्थिक जबाबदाऱ्या आणि शहरी जीवनशैलीमुळे तणाव वाढतो. यामुळे भावनिक खाणे वाढते आणि हार्मोन्समध्ये बदल होऊन वजन वाढते.
अनियमित झोप, उशिरापर्यंत मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर आणि शिफ्टमध्ये काम करणे यामुळे भूक आणि तृप्ती नियंत्रित करणारे हार्मोन्स बिघडतात, ज्यामुळे जास्त खाण्याची शक्यता वाढते. तसेच, व्यायामासाठी कमी मोकळी जागा आणि वाढते प्रदूषण यामुळे लोक बाहेर जाऊन शारीरिक हालचाल करण्यास टाळाटाळ करतात. काही लोकांमध्ये आनुवंशिक कारणेही लठ्ठपणाला कारणीभूत ठरतात.
योग्य वजन कसे राखावे?
लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही, तर छोटे पण नियमित बदल महत्त्वाचे आहेत: