पावसाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी आहारात अजिबात करू नका 'या' पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पोटाच्या गंभीर समस्या
राज्यासह संपूर्ण देशभरात नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे. वातावरणात वाढलेल्या गारव्यामुळे सगळीकडे थंडावा निर्माण झाला आहे. पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे रोगराई पसरते आणि साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. पाऊस पडल्यानंतर आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. सर्दी, खोकला, जुलाब, ताप, डेंग्यू, पोटदुखी, अपचनासंबंधित आजारांची लागण झाल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ किंवा दूषित पाण्याचे सेवन केल्यामुळे पोटात वेदना वाढतात आणि जुलाब, उलट्या होऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या पदार्थांचे अजिबात सेवन करू नका, अन्यथा शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवून आरोग्य बिघडू शकते. पावसाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींवर योग्य लक्ष देणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्या अतिशय आवडीने खाल्ल्या जातात. पण पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर हिरव्या पालेभाज्यांचे अजिबात सेवन करू नका. पालेभाज्यांमध्ये कोबी, पालक, मेथी किंवा इतर हिरव्या भाज्यांचा आहारात अजिबात समावेश करू नका. कारण पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि फंगस इन्फेक्शनचा धोका वाढतो. भाज्यांमध्ये कीटक किंवा बॅक्टेरिया असल्यामुळे घाणीचे पदार्थ पोटात गेल्यानंतर पचनक्रिया बिघडते किंवा जुलाब, उलट्या होऊन शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात अजिबात तेलकट किंवा तिखट पदार्थांचा समावेश करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात फॅट वाढण्याची शक्यता असते. तसेच सतत तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ऍसिडिटी वाढून अपचनाच्या समस्या वाढतात. समोसे, भजी इत्यादी पदार्थ तळण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. सतत एकाच तेलात पदार्थ तळून काढल्यामुळे डायरिया किंवा पचनक्रिया बिघडून शरीराला हानी पोहचू शकते.
पाऊस पडून गेल्यानंतर अनेक ठिकाणी जमिनीवर मशरूम उगवतात. हे मशरूम शरीरासाठी अजिबात चांगले नाही. जमिनीतून उगवणाऱ्या मशरूममुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. याशिवाय पावसाळ्यात डेअरी प्रॉडक्ट सुद्धा अजिबात खाऊ नये. दह्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात, ज्या शरीरासाठी अजिबात चांगल्या नाहीत.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर थंड वातावरणामुळे अनेक लोक चिकन, मटण इत्यादी मांसाहारी पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करतात. पण हे पदार्थ सतत खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच अपचनाच्या समस्या वाढतात. चिकन, मटण पचन होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे जास्त चरबी असलेले आणि लाल मांस युक्त पदार्थ अजिबात खाऊ नये.
Ans: पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रसार वाढू शकतो. त्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
Ans: जास्त तेलकट, तळलेले पदार्थ, उघड्यावरचे खाद्यपदार्थ, अस्वच्छ पाणी आणि पचनास जड पदार्थांचे सेवन कमी करणे फायदेशीर ठरू शकते.
Ans: ताजे फळे, हिरव्या भाज्या, मसाले (हळद, आले), पुरेसे पाणी आणि पौष्टिक आहार घेणे शरीराची प्रतिकारशक्ती टिकवण्यास मदत करू शकते.






