वयाच्या तिशीनंतर सुधृढ राहण्यासाठी महिलांनी आवश्यक करायला हव्यात 'या' चाचण्या
वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. शरीरात अनेक हार्मोनल आणि शारीरिक बदल होऊ लागतात. धावपळीच्या आयुष्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. सतत काम, बिघडलेले शारीरिक आणि मानसिक आरोग्य, हार्मोन्सचे बिघडलेले संतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे वाढत्या वयात शरीरसंबंधित दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे. बऱ्याचदा आजारपण वाढल्यानंतर त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने हेच छोटे आजार गंभीर रूप घेतात आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून टाकतात. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच सुदृढ राहण्यासाठी खालील चाचण्या वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. या चाचण्या केल्यामुळे वेळीच आजाराचे निदान होईल.(फोटो सौजन्य – istock)
तिशीनंतर महिलांमध्ये थायरॉईडची समस्या सामान्यपणे दिसून येते. वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे आणि मासिक पाळीत अनियमितता येणे ही याची लक्षणे असू शकतात.वेळेवर निदान झाल्यास हार्मोनल संतुलन राखणे सोपे जाते.
ही चाचणी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक ३ ते ५ वर्षांनी ही टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कर्करोगाची लक्षणे दिसण्यापूर्वीच पेशींमधील बदल या चाचणीमुळे समजतात.
वयानुसार महिलांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होऊ लागते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा (हाडे ठिसूळ होणे) धोका वाढतो.हाडांचे आरोग्य ओळखून वेळीच योग्य आहार आणि सप्लिमेंट्स सुरू करता येतात.
भारतीय महिलांमध्ये अॅनिमिया (रक्तक्षय) प्रमाण जास्त असते. तसेच, बदलत्या जीवनशैलीमुळे तिशीनंतर मधुमेहाचा धोकाही वाढतो. रक्तातील हिमोग्लोबिन आणि साखरेचे प्रमाण कळल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवता येते.






