
Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India
08 Jul 2026 11:30 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये 9 व्या वर्धापनदिनाचा उत्साह अजूनही सुरुच आहे. हा उत्साह आणखी वाढवण्यासाठी आता गेममध्ये एक खास ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा एक बॅटल इन युनिसन ईव्हेंट आहे. यामध्ये प्लेअर्सना टास्क पूर्ण केल्यानंतर विविध गेमिंग रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये ट्रॉफीपासून वेपन लूट क्रेटपर्यंत विविध रिवॉर्ड्सची यादी समाविष्ट आहे. याचा वापर प्लेअर्स गेममध्ये शत्रूंवर विजय मिळवू शकतात. बॅटल इन यूनिसन ईव्हेंटमध्ये तुम्ही केवळ प्रीमियम वेपन स्किनच नाही तर एक्सक्लूसिव ट्रॉफी आणि डिस्क होवर स्काईबोर्ड देखील अनलॉक करू शकतात.
08 Jul 2026 11:25 AM (IST)
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे घरासमोरील उघड्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर महावितरणच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
08 Jul 2026 11:20 AM (IST)
दरवर्षी पालखी सोहळा आयोजित केला जातो. सरकारकडून वारकऱ्यांसाठी अनेक दिलासादायक निर्णय घेतले जातात. त्यातच आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार ६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व परतणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना टोलमाफी लागू राहणार आहे. तसेच एसटी महामंडळाच्या टोलमाफी नसलेल्या बसेसलाही या कालावधीत टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.
08 Jul 2026 11:10 AM (IST)
अमेरिका इराणमध्ये पुन्हा तणाव वाढण्याची शक्यात निर्माण झाली आहे. होर्मुझमध्ये तीन व्यापारी जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर लष्करी कारवाई केली आहे. यामुळे मध्यूपर्वेत वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
08 Jul 2026 11:00 AM (IST)
जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये एका सेल्फीच्या मोहाने तीन निरागस मुलांचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. खदानीतील बेटासारख्या उंचवट्यावर सेल्फी काढताना एका मुलाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आणखी दोन मित्रांनी हात दिला, मात्र तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
08 Jul 2026 10:50 AM (IST)
राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ, जे मूळ महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, त्यांनाच आता बाईक-टॅक्सी चालवता येईल. याशिवाय, बाईक-टॅक्सी चालवणाऱ्यांना मराठी भाषा येणेही बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत वाहतूक, महिलांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न आणि परप्रांतीय चालकांचा वाढता सहभाग या सर्व गंभीर बाबींची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत राज्य सरकारची ही नवीन नियमावली आणि भूमिका स्पष्ट केली.
08 Jul 2026 10:40 AM (IST)
देशातील आघाडीच्या व्यवस्थापन संस्थांपैकी एक असलेल्या आयआयएम नागपूरने (IIM Nagpur) आपल्या विस्ताराच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. संस्थेने पुढील ५ वर्षांसाठी एक नवीन रणनीती तयार केली असून, त्याअंतर्गत भारतासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला प्रभाव मजबूत करण्याची योजना आखली आहे. या रणनीतीचा पहिला मोठा टप्पा म्हणून पुण्यात ७० एकरांवर नवीन कॅम्पस उभारण्यात येणार आहे.
08 Jul 2026 10:30 AM (IST)
ओमानच्या आखाताजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. कतारहून भारताकडे निघालेल्या एका LNG जहाजावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या जहाजावरील २९ कर्मचाऱ्यांपैकी चार भारतीय असून सर्वजण सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
08 Jul 2026 10:20 AM (IST)
मुंबई – ठाण्यासह उपनगर परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता रेल्वे गाड्यांवर देखील होत असल्याते पाहायला मिळत आहे. आज सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज पहाटेपासूनच ठाणे परिसरात हलक्या ते मध्य स्वरुपाचा पाऊस सुरु झाला आहे. सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे आता मध्य रेल्वेचा खोळंबा झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु आहे.
08 Jul 2026 10:10 AM (IST)
IMD Weather Forecast: महाराष्ट्रात सलग पाचव्या दिवशीही पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या सततच्या मुसळधार पावसामुळे विविध जिल्ह्यांमध्ये शेतीसह मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील २४ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा 'ऑरेंज अलर्ट' (Orange Alert) जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या घाट क्षेत्रासाठी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून, डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा किंवा रस्ते खचण्याचा धोका लक्षात घेता पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
08 Jul 2026 10:10 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळे जनजीवनही विस्कळीत होत आहे. असे असताना आता वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. यात ३ जणांचा मृत्यू झाला असून, ८ जण जखमी झाले आहेत. इतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे वृत्त आहे. हा अपघात कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ घडला, जिथे मलप्पुरम-वायनाड बोगदा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे.
08 Jul 2026 09:55 AM (IST)
Palghar Monsoon Alert: पालघर जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून 'येलो अलर्ट' देण्यात आला असला, तरी सकाळपासूनच जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून, वरुणराजाने पालघरला अक्षरशः झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात आज काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवत सतर्कतेचा इशारा दिला आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असून, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
08 Jul 2026 09:50 AM (IST)
श्रीगोंदा,अहिल्यानगर: पुणे जिल्ह्यात आणि भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने श्रीगोंदा तालुक्यातील ‘आर्वी बेट’ या गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. यामुळे या बेटाचा मुख्य भूमीशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून येथील सुमारे २०० लोकांची वस्ती पुराच्या पाण्यात अडकली आहे.
राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ, जे मूळ महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, त्यांनाच आता बाईक-टॅक्सी चालवता येईल. याशिवाय, बाईक-टॅक्सी चालवणाऱ्यांना मराठी भाषा येणेही बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत वाहतूक, महिलांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न आणि परप्रांतीय चालकांचा वाढता सहभाग या सर्व गंभीर बाबींची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत राज्य सरकारची ही नवीन नियमावली आणि भूमिका स्पष्ट केली.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची ओळख, कागदपत्रांची पडताळणी निश्चित करण्यासाठी नियमावलीत आवश्यक बदल करण्यात येत आहेत.