'या' अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार
३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात अहिल्यानगरला ५ कोटींचे तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच, मागील वर्षी माझी वसुंधरा ४.० अभियानातही राज्यात ६ कोटींचा दुसरा पुरस्कार मिळाला होता. या दोन्ही ११ कोटींच्या पुरस्कारांचे वितरण मंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय
महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव व आयुक्त यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार मुंबई येथील कार्यक्रमात स्वीकारला. यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज उपस्थित होत्या. अहिल्यानगर महापालिकेने माजी वसुंधरा अभियान २.० मध्ये १.५० कोटी, ३.० मध्ये ६.०० कोटी, ४.० मध्ये ६.०० कोटी, ५.० मध्ये ५ कोटी अशी १८.५० कोटी रुपयांची पारितोषिक मिळवली आहेत. महापालिकेने नुकतेच ई-गव्हर्नन्स व सेवा कर्मी अभियानातही राज्यात अव्वल पुरस्कार मिळवला असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
स्वच्छता हा केवळ सौंदर्याकरण अथवा सुशोभीकरणाचा भाग नाही. स्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहिले तर शहराच्या विकासात नागरिकांचे योगदानही वाढते. या सर्व सकारात्मक बाबींतून शहराच्या प्रगतीला चालना मिळते. येत्या काळात सर्व नागरिकांना एकत्र आणून शहराच्या संपूर्ण स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जातील, असे उपमहापौर धनंजय जाधव यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी २०० ते ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव दिला आहे. विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातूनही खेळाडूंसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देऊ. जिल्हा क्रीडा कार्यालयाने गुणवंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या माध्यमातून प्रशिक्षण सुरू करावे. चांगल्या योजनेचा प्रस्ताव माझ्याकडे द्यावा, त्यास नक्कीच परवानगी देऊ, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. अहिल्यानगरच्या वाडियापार्क क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले.






