Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणाचंही सरकार असो, राजकीय द्वेषातून कारवाई नको, आत्ता जे घडतं ते…, असं का म्हणाले अजित पवार ?

अजित पवार म्हणाले, “माझं स्पष्ट मत आहे की, केंद्रात आणि राज्यात कोणत्याही पक्षाचं, आघाडीचं किंवा युतीचं सरकार असो राजकीय द्वेषातून कोणत्याही सरकारने कारवाई करू नये. काही आमदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले आहेत, तर काही आमदार मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर राहिले आहेत.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 11, 2023 | 03:53 PM
कोणाचंही सरकार असो, राजकीय द्वेषातून कारवाई नको, आत्ता जे घडतं ते…, असं का म्हणाले अजित पवार ?
Follow Us
Follow Us:

औरंगाबाद – ईडीने बुधवारी (११ जानेवारी) सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे टाकले. कागल आणि पुण्यात काही ठिकाणांवर ही करावाई झाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत या कारवाईचा निषेध केला. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. “माझं स्पष्ट मत आहे की, केंद्रात आणि राज्यात कोणाचंही सरकार असो, राजकीय द्वेषातून कारवाई करू नये,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

अजित पवार म्हणाले, “माझं स्पष्ट मत आहे की, केंद्रात आणि राज्यात कोणत्याही पक्षाचं, आघाडीचं किंवा युतीचं सरकार असो राजकीय द्वेषातून कोणत्याही सरकारने कारवाई करू नये. काही आमदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले आहेत, तर काही आमदार मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर राहिले आहेत.” “ठाकरे गटाबरोबर असणाऱ्या आमदारांपैकी कोकणातील आमदार राजन साळवी, विदर्भातील आमदार नितीन देशमुख आणि कोकणातीलच सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक या तिघांवर एसीबीच्या चौकशा लावण्यात आल्या,” असा आरोप अजित पवार यांनी केला.

“केंद्र सरकारच्या आयकर विभाग, ईडी, एनआयए, सीबीआय यांना घटनेने, कायद्याने देशातील कुठल्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारच्या सीआयडी, एसीबी किंवा पोलीस विभाग या सर्व यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. मात्र, आत्ता जे घडतं आहे त्याला राजकीय रंग आहे अशी शंका काहींच्या मनात उपस्थित होत आहे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

Web Title: Ajit pawar first reaction on ed raids on hasan mushrif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2023 | 03:53 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • Hasan Mushrif
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • ईडी

संबंधित बातम्या

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
1

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
3

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
4

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.