मुबंई : शिवसेनेतील 39 आमदारांनी (Shivsena 39 MLA) बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पदभार स्विकारला. दोन दिवसीय विशेष अधिवेशनात (Two day special sessions) विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीपच्या विरोधात शिंदे गटातील आमदारांनी मतदाना केल्यामुळं (Against the whip during a vote) त्यांच्या विरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. तसेच पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी देण्यात आली आहे. मात्र सध्या राज्यात राजकीय पेच असताना, शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडाळाचा विस्तार करणार का? खाते वाटप होणार का? यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तसेच कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार यावर सुद्धा चर्चा झडत आहेत. त्यामुळं मंत्रीपदासाठी करोडो रुपयांची बोली लावल्याचे बोललं जात आहे. अश्यातच आता आमदारांना फेक कॉल येत आहेत.
[read_also content=”राजकीय पेच असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार? वाचा ‘काय आहे कायद्याची बाजू’ https://www.navarashtra.com/maharashtra/can-the-cabinet-be-expanded-when-there-is-political-embarrassment-read-whats-the-legal-side-306218.html”]
तर दुसरीकडे भाजप आमदार राहुल कुल (BJP MLA Rahul Kul) यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तसेच त्या व्यक्तींने तुम्हाला मंत्रिपद हवे असल्याचे ठराविक रक्कम द्यावी लागले अशी मागणी केली. त्यानंतर कुल यांना संशय आला. त्यांनी ही माहिती मी वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिसांनी या प्रकरणात सापळा रचून सध्या तरी 4 आरोपींना अटक केली आहे. मुंबई क्राइम ब्रांचनं ४ आरोपींना अटक केली आहे. त्यात रियाज शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी यांचा समावेश आहे. किला कोर्टाने या सर्व आरोपींना २६ जुलैपर्यंत क्राईम ब्रांच कस्टडीत पाठवले आहे. तसेच सध्या पुढील तपास सुरू आहे. फसवणुकीला बळी पडू नये असं पोलिसांनी आवाहन केलं आहे.