पाण्यावरून मनपा प्रशासन धारेवर; प्रशासक काळात नगरसवेकांच्या नावे दाखवलेला निधी गेला कुठे?
अंबिकानगर परिसरातील नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी व अस्वच्छता वाढली आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रवही वाढत असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी करण्यात आली. आझाद चौक ते सावरकर चौक दरम्यान बांधकाम साहित्याची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. हा रस्ता करारावर देण्यात आला आहे का, याबाबत प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागण्यात आले. तसेच बीड बायपासवर सिग्नल बसविण्याची मागणी पुढे आली.
सातारा-देवळाई भागातील पाणीटंचाई गंभीर बनली असून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या भागाच्या विकासासाठी किमान १५० कोटींची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र स्वच्छता पथक नेमण्याची मागणी करण्यात आली. नियमित देखभाल नसल्याने नागरिकांना गैरसोय होत असल्याचे नमूद करण्यात आले.
चिकलठाणा रस्ता रुंदीकरणासाठी परिसरात झालेल्या कारवाईनंतर बाधितांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. सुमारे ५० ते ६० नागरिकांना मावेजा देणे बाकी असून, त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
प्राथमिक चर्चेनंतर सदस्यांनी मांडलेल्या मागण्यांचा अंतिम अर्थसंकल्पात कितपत समावेश होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहराच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत अर्थसंकल्पात बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Sambhaji Nagar 2026: संभाजीनगरमध्ये ‘व्हीप’ वॉर! अंबादास दानवेंवर स्वपक्षीय आमदाराचे गंभीर आरोप






