छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी फुल्ल असूनही शहर तहानलेले (photo Credit- AI)
गुढीपाडव्याला जॅकवेल द्वारे पाणी उपसा करण्याची घोषणा महापालिकेने केली असलीतरी शहरवासीयांना हे ‘दिव्य स्वप्न’ वाटत आहे. शहरवासीयांना दोन दिवसाआड पाणी देण्यासाठी नव्या जलवाहिनीचे नव्वद टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असून पंपहाऊसमध्ये बसवलेल्या जॅकवेल मधून पाणी उपसा करुन दररोज पाणी देण्याची
व्यवस्था केल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी मागील दोन दिवसांपासून तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण देत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. यावर उपाय म्हणून टैंकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची सोय केली गेली. माञ, इथेही प्रशासनाच्या चुकांमुळे पाण्याचे टँकर भरण कठीण जात असल्याने पाण्याच्या टाक्यांवर टँकरच्या रांगा लागल्या आहेत.
उन्हाचा कडाका वाढला! विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय
संभाजीनगरात दररोज ८३ टँकरद्वारे ४८० फेऱ्यांव्दारे ८५ व सहा त्यांना पाणीपुरवठा केला जातो. नवीन वसाहतींमध्ये महानगरपालिकेने मागील २५ वर्षांपासून मात्र पाईपलाईन टाकलेल्या नाहीत. त्यामुळे अशा वसाहतींना टँकरद्वारे वर्षभर पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यामध्ये पाण्याची मागणी वाढते आहे. मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने टँकरची मागणी सुद्धा वाढलो आहे.
संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यामध्ये सातत्याने काही ना काही अडचणी येत आहेत. कधी तांत्रिक बिघाड, तर कधी पाईपलाईन फुटणे अशा अनेक कारणांमुळे संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यामध्ये सातत्याने काही ना काही विघ्न येत आहेत. मंगळवारी दिवसभर शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.






