Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सेनेचा ‘दगाबाज रे’ अभियान

निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडीने दोन दिवसांपूर्वी मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढला होता. यानंतर शिवसेनेकडून आता 'दगाबाज रे' दौरा काढला जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 03, 2025 | 03:40 PM
५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद (Photo Credit - X)

५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद
  • सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सेनेचा ‘दगाबाज रे’ अभियान
  • जाणून घ्या संपूर्ण दौऱ्याचा तपशील

Maharashtra Politics: यंदा पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. हा आनंदमय सण गोड करण्याचे वचनही दिले होते. मात्र, दिवाळी होऊन आठवडा उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे अनुदान जमा झालेले नाही. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे हे ‘दगाबाज रे’ असा मराठवाडा संवाद दौरा करणार आहेत.

‘दगाबाज रे’ दौरा

ते ५ ते ८ नोव्हेंबर या चार दिवसांत शेतकऱ्यांशी संवाद साधतील, अशी माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. ते क्रांतीचौक येथील मातृभूमी प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडीने दोन दिवसांपूर्वी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढला होता. यानंतर शिवसेनेकडून आता ‘दगाबाज रे’ दौरा काढला जाणार आहे.

मराठवाड्यात चार दिवस दौरा…

‘सत्याच्या मोर्चाला’ नागरिकांनी प्रतिसाद दिला, आता या संवाद दौऱ्यातही नागरिक आपली कैफियत मांडतील, असे दानवे म्हणाले. या संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरे हे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार आहेत. ५ ते ८ नोव्हेंबर असा चार दिवसांचा हा दौरा असेल. मराठवाड्यानंतर ते राज्याचा दौरा करतील, अशी माहिती दानवे यांनी दिली.

‘एनडीआरएफ’ निकष आणि सरकारी मदत

दानवे म्हणाले, “सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता सरकार मदत करू शकत नाही, अशी स्थिती आहे. मोजकीच मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे. ‘एनडीआरएफ’चे निकष बदला असे आम्ही सरकारला सांगितले होते, पण पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही, मात्र सरकार उगाच ढोल बडवत आहे.” त्यामुळे या संवाद दौऱ्यातून शेतकऱ्यांची कैफियत समजून घेण्याचा हा प्रयत्न असेल.

Sharad Pawar at Satyacha Morcha: लोकशाही वाचवायची असेल तर..; मुंबईतील सत्याच्या मोर्चातून शरद पवारांचा एल्गार

दौऱ्याचा तपशील

बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी संभाजीनगर येथून दौऱ्याला प्रारंभ होईल. यानंतर ६, ७, ८ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील इतर ठिकाणी भेट देऊन ते शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतील. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संभाजीनगर येथील सुभेदारी विश्रामगृहात ते संभाजीनगर-जालना येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांशी दगाबाजी

अंबादास दानवे म्हणाले की, “शेतकरी दिवाळी साजरी करू शकला नाही. त्यांना मदत पोहचली नाही. खरडून गेलेल्या जमिनीची काहीही मदत आलेली नाही. सरकारने कर्जमुक्तीसाठी ३० जून ही तारीख दिली आहे. मराठवाड्याला काय पॅकेज मिळाले ते पाहण्यासाठी येणार असल्याचे सांगितले होते. शासन शेतकऱ्यांशी दगाबाजी करत आहे. त्यामुळे ‘दगाबाज रे’ अशी मोहीम आम्ही सुरू करत आहोत.” या दौऱ्यात शेतकरी बांधवांनी तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Web Title: Uddhav thackeray to interact with farmers from november 5 to 8

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • BJP
  • shivsena
  • state government
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Bihar Election Opinion Poll 2025: तेजस्वी यादवांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती; निवडणूक सर्वेक्षणाने वाढवले भाजपचे टेन्शन
1

Bihar Election Opinion Poll 2025: तेजस्वी यादवांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती; निवडणूक सर्वेक्षणाने वाढवले भाजपचे टेन्शन

महापालिकेच्या मलिद्यासाठी ठाकरे बंधू एकत्र, मुंबईकर जनता त्यांचा…; शंभूराज देसाईंची टीका
2

महापालिकेच्या मलिद्यासाठी ठाकरे बंधू एकत्र, मुंबईकर जनता त्यांचा…; शंभूराज देसाईंची टीका

Sharad Pawar at Satyacha Morcha: लोकशाही वाचवायची असेल तर..; मुंबईतील सत्याच्या मोर्चातून शरद पवारांचा एल्गार
3

Sharad Pawar at Satyacha Morcha: लोकशाही वाचवायची असेल तर..; मुंबईतील सत्याच्या मोर्चातून शरद पवारांचा एल्गार

Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
4

Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.