Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी संकट गडद! महावितरणच्या ‘झटका’मुळे ५० तास पाणीपुरवठा बंद

छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणच्या वीज बिघाडामुळे पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. ९०० मिमी जलवाहिनी बंद पडल्याने ५० तास पाणीपुरवठा खंडित झाला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 29, 2025 | 04:07 PM
Chhatrapati Sambhajinagar Water Crisis (Photo Credit - X)

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • नव्या जलवाहिनीला वीज पुरवठ्याचा फटका
  • पाच दिवसाआड मिळणारे पाणी आता पुन्हा आठ दिवसांवर
  • नागरिकांमध्ये संताप
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नव्याने कार्यान्वित केलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या (महावितरण) विजेचा जोरदार फटका बसला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या योजनेतून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे, ज्यामुळे शहरात पुन्हा एकदा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल

शहराला दररोज मिळणाऱ्या १७१ एमएलडी (MLD) पाण्याऐवजी आता केवळ १४५ एमएलडी पाणी मिळत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचा परिणाम थेट पाणीपुरवठा योजनांवर झाला आहे. दिवाळीपूर्वी आणि ऐन दिवाळीत वीज बिघाडामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली होती. दिवाळी संपताच पुन्हा वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला.

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले

पाच दिवसाआड मिळणारे पाणी आता पुन्हा आठ दिवसांवर गेले आहे. अनेक भागांत एक दिवस उशिराने पाणी देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टॅक्स घोटाळा’ कॉल सेंटरचा पर्दाफाश! अमेरिकन नागरिकांना लाखो डॉलरचा गंडा

२६ एमएलडी योजना ५० तास बंद

दोन दिवसांपूर्वी फारोळा वीज उपकेंद्रात मोठा बिघाड झाला. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या २६ दललि, ५६ दललि आणि १०० दललि क्षमतेच्या तिन्ही योजना एकाच वेळी बंद पडल्या, ज्यामुळे शहरवासीयांना निर्जळीचा (पाणी नसण्याचा) सामना करावा लागला. ५६ आणि १०० दललि क्षमतेच्या योजना सुरू झाल्या, मात्र २६ दललि क्षमतेची योजना दुरुस्तीअभावी बंद राहिली. वीज उपकेंद्रातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी साहित्य मिळत नसल्याने दुरुस्तीचे काम करता आले नाही. या २६ एमएलडी योजनेतून मिळणारे सुमारे ३१ एमएलडी पाणी बंद झाल्याने शहरात पाण्याचा मोठा तुटवडा जाणवला.

५० तासांनंतर दिलासा

तब्बल ५० तासांनंतर (मंगळवारी सायंकाळी ६ वाजता) २६ एमएलडीचा एक पंप सुरू करण्यात आला आणि रात्री ८ वाजता शहरात पाणी आले. हा पाणीपुरवठा सुरू झाल्याने पाण्याचा गॅप कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्यातील अडथळ्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

नाशिकच्या तयारीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या तीर्थक्षेत्रांकडे पर्यटकांचा ओघ! ८७१९ कोटींच्या विकास आराखड्याचे काम मात्र कागदावरच

Web Title: Water supply disrupted for 50 hours in chhatrapati sambhajinagar due to shock from mahavitaran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • water
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Paithan News: पैठणमध्ये दुहेरी संकट! गॅस टंचाईमुळे ‘इंडक्शन’चा वापर वाढला; वीज यंत्रणेवर ताण आल्याने शहर अंधारात
1

Paithan News: पैठणमध्ये दुहेरी संकट! गॅस टंचाईमुळे ‘इंडक्शन’चा वापर वाढला; वीज यंत्रणेवर ताण आल्याने शहर अंधारात

Khultabad: ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘धान्य महोत्सव’ प्रभावी मंच; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन
2

Khultabad: ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘धान्य महोत्सव’ प्रभावी मंच; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन

Chhatrapati Sambhajinagar: अवकाळी पावसाचे सत्र संपले! आता पुन्हा उष्णतेत होणार वाढ; सिमेंट रस्ते, इमारतींमुळे वाढतेय तापमान
3

Chhatrapati Sambhajinagar: अवकाळी पावसाचे सत्र संपले! आता पुन्हा उष्णतेत होणार वाढ; सिमेंट रस्ते, इमारतींमुळे वाढतेय तापमान

इंग्रजी शाळांना ‘संरक्षण कायदा’ लागू करा! संस्थाचालकांवरील हल्ले आणि खंडणीच्या प्रकारांमुळे ESM आक्रमक
4

इंग्रजी शाळांना ‘संरक्षण कायदा’ लागू करा! संस्थाचालकांवरील हल्ले आणि खंडणीच्या प्रकारांमुळे ESM आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.