
नवा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी तंत्रज्ञ सल्लागाराची नियुक्ती
मुख्यमंञी फडणवीस यांचे आश्वासन
प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार
पुणे: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ (सरळ) मार्गाला केंद्र सरकारने तांत्रिक कारणाने नकार दिला आहे.नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणीसाठीच्या (जीएमआरटी) ‘बफर झोन’मुळे मूळ मार्ग आराखड्यास मान्यता देणे शक्य नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर आता कमीत कमी वळसा घेऊन आणि महत्त्वाची गावे सामावून घेणारा नवा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी तंत्रज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याचे समोर आले आहे.
विधान परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांनी पुणे-नाशिक रेल्वेच्या रखडलेल्या मार्गाबाबत आणि ‘अलाइनमेंट’मधील बदलाबाबत प्रश्न उपस्थित केला. माहिती अधिकाराचा दाखला देत ते म्हणाले, की ‘जीएमआरटी’ने स्वतःहून असा कोणताही तांत्रिक आक्षेप नोंदवला नसल्याचे समजते. मात्र, तरीही मार्ग बदलला जात आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून समृद्धी महामार्गावर आंदोलने होत आहेत.
तांबे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कृती समितीची संयुक्त बैठक घेण्याची मागणीही केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की या रेल्वेच्या पाठपुरावा करण्यासाठी आपण दोनदा केंद्र सरकारकडे सादरीकरण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Nanded News : रेल्वे स्टेशनवर तिकीट दलालीचा संशय; ‘हाऊसफुल’ कोट्यांमागे हजेरीची साखळी?
तसेच यावर तज्ञ समिती नवीन मार्गाचा अभ्यास करणार आहे. रेडिओ दुर्बिणीच्या ‘बफर झोन’चा सविस्तर अभ्यास करून ‘कमीत कमी वळसा’ घेणारा मार्ग निश्चित केला जाईल. तज्ज्ञांना त्यांचा अहवाल देण्यासाठी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी दिला जाईल.मार्ग बदलताना जास्तीत जास्त महत्त्वाची गावे रेल्वे नकाशावर राहतील याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
भारतीय रेल्वेत भरतीची मोठी संधी!
भारतीय रेल्वे ने २०२६ साठी सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांच्या ११,१२७ रिक्त जागांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. ही भरती देशभरातील १७ रेल्वे विभागांमध्ये होणार असून, तांत्रिक पात्रता असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
भारतीय रेल्वेत भरतीची मोठी संधी! तांत्रिक निकषांमध्ये पात्र उमेदवारांसाठी खास भरती
रेल्वे बोर्डाच्या माहितीनुसार, या रिक्त पदांचे मूल्यांकन मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) द्वारे करण्यात आले आहे. त्यानंतर सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तर मध्य रेल्वे मध्ये ४५७ पदांवर भरती होणार असून प्रयागराज आणि परिसरातील उमेदवारांना याचा फायदा होईल. विभागनिहाय रिक्त पदांचा विचार केला तर पूर्व तटीय रेल्वे मध्ये सर्वाधिक १,६२५ पदे भरली जाणार आहेत. तसेच दक्षिण पूर्व रेल्वे (१,५३१), मध्य रेल्वे (१,४००), पूर्व सीमांत रेल्वे (१,२७६), उत्तर रेल्वे (७४०) आणि पूर्व मध्य रेल्वे (७००) या विभागांमध्येही मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.