एनसीएमसी कार्डसाठी आगारात गर्दी! यवतमाळ आगारात ५ हजार कार्ड अॅक्टिव्ह; जिल्ह्यात ९ ठिकाणी सुविधा उपलब्ध
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केले आहे. आदेशानुसार कार्डशिवाय सवलत मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आगारांत कार्ड काढण्यासाठी गर्दी झाली असून यवतमाळ आगारात सुमारे ५ हजार कार्ड अॅक्टिव्हेट करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सवलतीच्या दराने बसप्रवास करणाऱ्या महिला तसेच शंभर टक्के सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक केले आहे. यासंदर्भातील आदेश २ फेब्रुवारी रोजी काढण्यात आला असून, या कार्डशिवाय कोणतीही भाडे सवलत दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये कार्ड काढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान, यवतमाळ आगारात आतापर्यंत सुमारे ५ हजार कार्ड अॅक्टिव्हेट करण्यात आली आहेत. मात्र अद्याप एकही कार्ड प्रत्यक्ष इश्यू करण्यात आलेले नाही. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.(फोटो सौजन्य – istock)
प्राथमिक शिक्षकांची ५०० पदे रिक्त! भंडारा जिल्ह्यातील प्रकार; एकाच शिक्षकावर ४ वर्गांची जबाबदारी
पूर्वी महिला प्रवासी आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवून अर्ध्या दरात प्रवास करत होत्या, तर ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण सवलत मिळत होती. मात्र नव्या नियमांनुसार बसमध्ये इलेक्ट्रॉनिक पडताळणीद्वारेच सवलत लागू होणार आहे. त्यामुळे कार्ड नसल्यास संबंधित प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ९ आगारांमध्ये २१ मार्चपासून कार्ड वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ आगारात आतापर्यंत सुमारे ५ हजार कार्ड तयार करून अॅक्टिव्हेट करण्यात आली आहेत, मात्र त्यांचे वितरण अद्याप सुरू झालेले नाही. कार्डसाठी १९९ रुपये शुल्क आकारले जात आहे. जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड दिले जाणार आहे. तसेच या कार्डमध्ये किमान १०० रुपयांचा शिल्लक ठेवणे बंधनकारक असून, ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
बाजारात गव्हाचे दर घसरले! आखाती युद्धाचा परिणाम; क्विंटलमागे ६०० रुपयांचा बसतोय फटका
सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी कार्ड अनिवार्य केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व नऊ आगारांमध्ये विशेष नोंदणी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही कार्ड नोंदणीसाठी कॅम्प आयोजित करण्यात आले असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.






