'1..2..3 नाही तर', जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, प्रशिक्षक संदीप ढवळेंची घोषणा
याच पार्श्वभूमीवर जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी पथकाच्या तयारीबाबत माहिती देताना सांगितले की, जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या या महत्त्वाच्या दिवसासाठी पथकातील गोविंदांनी मागील चार महिन्यांपासून कसून सराव केला आहे. यंदा पथकाचे प्राथमिक लक्ष्य 10 थर रचण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.
Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख
“10 थरांचा प्रयत्न असेल. त्यानंतर मुलांची स्थिती, त्यांची कामगिरी आणि परिस्थिती पाहून 11 थरांसाठी जायचे की नाही, याचा निर्णय घेऊ,” अशी भूमिका संदीप ढवळे यांनी मांडली. त्यामुळे जय जवान पथकाकडून 10 थर यशस्वी झाल्यास 11 थरांचा ऐतिहासिक प्रयत्न पाहायला मिळण्याची उत्सुकता वाढली आहे.
जय जवान पथकाला उंच मानवी मनोरे रचण्याचा मोठा अनुभव आहे. ढवळे यांनी सांगितल्यानुसार, 2009 मध्येच पथकाने 9 थर रचले होते. त्यामुळे यंदा 10 थरांचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने पथकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या दहीहंडीमध्ये उंच थरांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. काही पथकांनी 10 ते 11 थर रचण्याचा संकल्प केला आहे. नऊ थर रचणाऱ्या पथकांची संख्याही वाढल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे ठाण्यातील दहीहंडी उत्सवही मोठ्या बक्षिसांमुळे चर्चेत आहे. स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवात एकूण 71 लाख रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार असून, हा महोत्सव ‘सेलिब्रिटी हंडी’ म्हणूनही ओळखला जातो. ठाण्यातील मानाच्या टेंभी नाका दहीहंडीमध्ये मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या ठेवण्यात आल्या आहेत. विजेत्या पथकांना प्रत्येकी 1 लाख 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
दहीहंडी उत्सवासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा 254 सार्वजनिक दहीहंडींचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.






