Pimpri-Chinchwad women police marriage
व्हायरल होत असलेल्या बातमीनुसार त्यांनी अजून लग्न केलेलं नाही, पण त्यांनी एकमेकींसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रजेचा अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत लग्नाची पत्रिकाही जोडली आहे, असे समजते.
व्हायरल होत असलेल्या या बातमीला सकाळपासून सगळ्यांनी उचलून धरलं आहे. दैनिक प्रभात, लोकमत, Free Press Journal, LatestLY या प्रसारमाध्यमांनी या बातमीचे वृत्त डिजिटल पोर्टलवर पब्लिश केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अजून लग्न केलेलं नाही, पण त्या 30 ऑगस्टला लग्न करण्याच्या बेतात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीच्या वेळी त्यांची ओळख झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि ते लग्नापर्यंत पोहोचलं.
काही मीडिया रिपोर्टमध्ये असंही लिहिण्यात आलं आहे की त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध आहे. त्यांच्या घरच्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अजून तरी अधिकृत माहिती आलेली नाही.
सोशल मीडियावर समलैंगिक संबंधावर पुन्हा हा वाद सुरू झाला आहे की लग्न करायचं की करू नये? दोघेही प्रौढ आणि समंजस असल्यामुळे त्यांना कायद्याने कोणीही अडवू शकत नाही. पण अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे विवाहाचा दर्जा आणि विवाह नोंदणी या गोष्टीला काही अडथळे येणार तर नाही ना, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
दावा: दोन महिला पोलिसांनी एकमेकींसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.
निष्कर्ष: खरा! पण अजून त्यांचं लग्न झालेलं नाही आहे. म्हणून लग्न झाल्याचा दावा खोटा आहे.
दोघींचा विवाह झाला आहे का? तर नाही. विवाह झाल्याचं ज्या बातम्या तुम्ही सोशल मीडियावर वाचत आहात, तर त्या खोट्या आहेत. अजून त्यांनी लग्नाची गाठ बांधलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी लग्न केलं, असा दावा करणं चुकीचं आहे. आळंदी येथे विवाह सोहळा होईल. तरीसुद्धा नवराष्ट्र त्याची हमी देत नाही.






