File Photo : Ration Card नाहीतर तुमचंं रेशन कार्ड बंद होणार, शेवटच्या १५ दिवसांत हे काम कराचं
चिमूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरजूंना अत्यंत अल्पदरात रेशनकार्डद्वारे धान्याचा पुरवठा केला जातो. यातील योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता शासनाने ई-केवायसी करण्याची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई-केवायसीतून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ई-केवायसी न केलेल्यांचे रेशन 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.
हेदेखील वाचा : पार्किंग आणि कार चोरीचं टेन्शन मिटलं, गुगल मॅपचं हे फीचर करणार तुम्हाला मदत
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्तातील धान्य मिळविण्यासाठी सर्व रेशनकार्ड धारकांना ई-केवायसीचे बंधन घालण्यात आले आहे. अन्न, सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीदेखील अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलीच नाही. त्यांचे रेशन 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. तत्पूर्वी ई- केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. शिधापत्रिकाधारकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही.
याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशनकार्डमधून वगळली जाणार आहे. त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत. शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थीने आपल्या क्षेत्रातील स्वस्त पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. जो सदस्य मुदतीत ई-केवायसी करणार नाही. त्याचे नाव शिधापत्रिकेतून वगळण्यात येईल.
प्रक्रियेतून बनावट लाभार्थीचा शोध…
रेशनकार्डवर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी अपात्र असतानाही अनेकजण स्वस्तातील धान्य घेतात. याशिवाय अनेक जण हयात नाही. मात्र, अद्यापही त्यांची नावे शिधापत्रिकांमधून वगळण्यात आली नाही. दुसरीकडे बनावट रेशनकार्ड काढून शासकीय योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत.
जवळच्या धान्य दुकानात जाऊन करावी लागणार नोंदणी
या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदलेली आहेत, त्या सर्वांना ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी ते त्याच्या जवळच्या अन्न धान्य दुकानात जाऊन ई-पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सिडिंग करून घ्यायचा आहे. ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे. स्थलांतरित कुटुंबांना देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई- केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे.
हेदेखील वाचा- गुगल मॅपचे फ्युएल इकॉनॉमी फीचर तुम्हाला ट्रीपचे पैसे वाचवण्यासाठी करेल मदत, आताच करा ही सेटिंग