दावडी आणि गोलवली परिसरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयाला धडक दिली. महिला हंडे-कळशी घेऊन कार्यालयात दाखल झाल्या आणि अधिकार्यांना जाब विचारला. नंदू परब यांनी इशारा दिला की, लवकरात लवकर पाण्याची समस्या सुटली नाही तर एमआयडीसी कार्यालयालाच टाळे ठोकले जाईल.
दावडी आणि गोलवली परिसरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयाला धडक दिली. महिला हंडे-कळशी घेऊन कार्यालयात दाखल झाल्या आणि अधिकार्यांना जाब विचारला. नंदू परब यांनी इशारा दिला की, लवकरात लवकर पाण्याची समस्या सुटली नाही तर एमआयडीसी कार्यालयालाच टाळे ठोकले जाईल.