संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) प्रस्थानाला काहीच तास शिल्लक आहेत. तरी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरुच आहे. इंद्रायणी नदीत आज पुन्हा एकदा फेसाळ पाणी (Polluted Water Of Indrayani River) वाहताना दिसत आहे. हे पाणी वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे.(Indrayani River News)
कारवाईचा फार्स
पिंपरी चिंचवड हद्दीतील अनेक कंपन्या इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडतात. त्यामुळे नदीची (Indrayani River Pollution Alandi) अवस्था दयनीय झाली आहे. यापूर्वी नदी प्रदूषित करणाऱ्या सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे असल्याने कारवाईचा हा फार्स होता असं चित्र निर्माण झालं आहे.
इंद्रायणी नदीवर फेस दिसत आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे नदी खूप प्रदूषित झाली आहे. नदीची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या सगळ्या अनाधिकृत कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यावेळी नागरिकांच्या मागणीला यश आलं होतं आणि या कंपन्यांवर कारवाई देखील केली होती. मात्र अजूनही या नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न प्रलंबित आहे.
लोणावळा शहरातून इंद्रायणी नदीचा उगम होतो. त्या दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनधिकृत कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेलं रसायनयुक्त पाणी नदीत सोडलं जातं. या प्रदूषणामुळे नदीच्या काठावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
येत्या 11 जूनला आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यामुळे त्याआधी दोन दिवसांपासून लाखो वारकरी आळंदीत दाखल होतात. दोन दिवस लाखो वारकऱ्यांसाठी या नदीचं पाणी तीर्थासमान असतं मात्र याच नदीचं पाणी प्रदूषित झालं आहे.
नागरिकांच्या आरोग्याला धोका
लाखो नागरिक इंद्रायणीमध्ये स्नान करतात. मात्र नदीचं पाणी प्रदूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. रसायनामुळे त्वचारोगाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. शासनाने या नदीकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रदूषणावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.