• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Manoj Jarange Patil On Hunger Strike For Maratha Reservation

Manoj Jarange Patil hunger strike : सरकारच्या अडचणीत पुन्हा वाढ! मनोज जरांगे पाटलांचा आमरण उपोषणचा एल्गार

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. अंतरवली सराटी येथे ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील उपोषणावर बसले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 25, 2025 | 12:06 PM
manoj jarange patil on hunger strike for maratha reservation

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणावर बसले आहेत (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जालना :  महायुतीचे सरकार येऊन दोन महिने झाले असून एका मागून एक अडचणी येत आहे. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणावर बसले आहेत. त्यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे.

मागील दोन वर्षापासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण, आंदोलन आणि मोर्चा काढून जोरदार आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा समाज हा कुणबी असून सर्व मराठा समाजाला कुणबी अंतर्गत ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे अशी मूळ मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात महायुतीला अद्याप यश आलेले नाही. यामुळे महायुती सरकार विरुद्ध मनोज जरांगे पाटील असे चित्र अनेकदा राज्यामध्ये दिसून येत आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

विधानसभा निवडणूकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून राजकारणाच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी निर्णय मागे घेऊन माघार घेतली. राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला लक्ष देऊन मतदान करायला सांगितले होते. मात्र तरी देखील राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद गेले असून आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. आता फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्यामुळे जरांगे पाटील यांचे उपोषण तीव्र होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले असून आपली भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “तुमच्या मनामध्ये आमच्या लेकरांच्या जेवणात विष कालवण्याचा विचार आहे. आम्हाला फक्त आमचं आहे ते द्या. मागण्या सगळ्या मान्य करा. आणि तुम्ही दिल्या नाही करी हरकत नाही. दिल्या नाहीत तर आमच्यासमोर चित्र स्पष्ट होईल. आता हे उपोषण सुरु आहे. उपोषण आहे तो पर्यंत काही बोलणार नाही. उपोषण पूर्ण होऊ द्या. पण मग त्याच्यानंतर त्यांचा आणि आपला सामना लागेल,” अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला होता. मात्र आता मुख्यमंत्री बदलले आहेत. यावर जरांगे पाटील म्हणाले की, “त्यावेळेस तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना करु दिलं जात नव्हतं. आता सगळं यांच्याकडे आहे. ते होते तेव्हा त्यांनी काही दिलं आता राहिलं आहे ते तुम्ही द्या. शिंदे चांगले आणि फडणवीस वाईट असं म्हणण्यापेक्षा आता राहिलं आहे ते देऊन टाका. त्यांनी नाही दिलं तर तुम्ही द्या. बघू आता कोण काय देत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात येणारच आहे,” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण कधी संपेल याबाबत देखील माध्यमांनी त्यांना प्रश्न केला. याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे उपोषण अर्धे राहिल असे बोलले होते. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, “त्यांना नाही कळणार. त्यांना उपोषण म्हणजे काय असतं हे नाही कळणार. त्यांना लोकांच्या भावना नाही कळणार. गरिबांच्या भावना, उपोषण, आंदोलन कधी थांबवायचं आणि कोणत्या टप्प्यावर नाही थांबवायचं हे त्यांना कळणार नाही. यांना राखरांगोळी करुन घेण्याची सवय लागली आहे. समाजाला काय आणि कधी द्यायचं हे त्यांना कळायचं नाही. समाजाच्या पदरात कसं पाडून घ्यायचं हे माझ्या मनात असतं. म्हणून मागील 75 वर्षात कधी न मिळणार आरक्षण मी गोरगरिबांच्या पदरात टाकलं आहे. आता हे उपोषण कसं होणार हे सगळ्यांना कळणार आहे,” अशा भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच राज्यात इतर ठिकाणी आंदोलन करु नये असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

Web Title: Manoj jarange patil on hunger strike for maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • Maratha Reservation

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asaduddin Owaisi : चार नाही आठ मुले जन्माला घाला! ओवैसींचा नवनीत राणांवर टोला; प्रत्युत्तरात नागरिकत्व काढण्याची मागणी

Asaduddin Owaisi : चार नाही आठ मुले जन्माला घाला! ओवैसींचा नवनीत राणांवर टोला; प्रत्युत्तरात नागरिकत्व काढण्याची मागणी

Jan 06, 2026 | 11:13 AM
CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

Jan 06, 2026 | 11:08 AM
Solapur Crime: आधी प्रेयसीचा गळा चिरला, नंतर प्रियकराने स्वतःच्याही गळ्यावर केले वार; कारण काय?

Solapur Crime: आधी प्रेयसीचा गळा चिरला, नंतर प्रियकराने स्वतःच्याही गळ्यावर केले वार; कारण काय?

Jan 06, 2026 | 11:06 AM
घरातील वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन लहान मुलांसाठी महत्त्वाचे, संकटाच्या वेळेत होईल फायदा

घरातील वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन लहान मुलांसाठी महत्त्वाचे, संकटाच्या वेळेत होईल फायदा

Jan 06, 2026 | 11:02 AM
धक्कादायक ! चौघांच्या टोळक्याने तरुणाची चाकूने भोसकून केली हत्या; आधी बेदम मारहाण केली अन् नंतर…

धक्कादायक ! चौघांच्या टोळक्याने तरुणाची चाकूने भोसकून केली हत्या; आधी बेदम मारहाण केली अन् नंतर…

Jan 06, 2026 | 11:01 AM
दर्पणकार जांभेकर यांच्या जन्मदिनी मराठी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला झाली सुरुवात; जाणून घ्या 06 जानेवारीचा इतिहास

दर्पणकार जांभेकर यांच्या जन्मदिनी मराठी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला झाली सुरुवात; जाणून घ्या 06 जानेवारीचा इतिहास

Jan 06, 2026 | 10:56 AM
‘Stranger Things 5’ या डॉक्यूमेंट्रीचा भावुक करणारा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या रिलीज डेट

‘Stranger Things 5’ या डॉक्यूमेंट्रीचा भावुक करणारा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या रिलीज डेट

Jan 06, 2026 | 10:51 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Jan 05, 2026 | 07:52 PM
Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Jan 05, 2026 | 07:47 PM
Pune Election :  लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण –  मिनल धनवटे

Pune Election : लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण – मिनल धनवटे

Jan 05, 2026 | 07:40 PM
Sangli News :  लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Sangli News : लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Jan 05, 2026 | 07:30 PM
किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश  अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

Jan 05, 2026 | 07:23 PM
Avinash Jadhav: बिनविरोधप्रकरणी मनसे आक्रमक; निकाल राखून ठेवण्याची मागणी

Avinash Jadhav: बिनविरोधप्रकरणी मनसे आक्रमक; निकाल राखून ठेवण्याची मागणी

Jan 05, 2026 | 07:17 PM
Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Jan 05, 2026 | 03:12 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.