• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Manoj Jarange Patil On Hunger Strike For Maratha Reservation

Manoj Jarange Patil hunger strike : सरकारच्या अडचणीत पुन्हा वाढ! मनोज जरांगे पाटलांचा आमरण उपोषणचा एल्गार

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. अंतरवली सराटी येथे ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील उपोषणावर बसले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 25, 2025 | 12:06 PM
manoj jarange patil on hunger strike for maratha reservation

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणावर बसले आहेत (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जालना :  महायुतीचे सरकार येऊन दोन महिने झाले असून एका मागून एक अडचणी येत आहे. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणावर बसले आहेत. त्यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे.

मागील दोन वर्षापासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण, आंदोलन आणि मोर्चा काढून जोरदार आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा समाज हा कुणबी असून सर्व मराठा समाजाला कुणबी अंतर्गत ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे अशी मूळ मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात महायुतीला अद्याप यश आलेले नाही. यामुळे महायुती सरकार विरुद्ध मनोज जरांगे पाटील असे चित्र अनेकदा राज्यामध्ये दिसून येत आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

विधानसभा निवडणूकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून राजकारणाच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी निर्णय मागे घेऊन माघार घेतली. राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला लक्ष देऊन मतदान करायला सांगितले होते. मात्र तरी देखील राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद गेले असून आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. आता फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्यामुळे जरांगे पाटील यांचे उपोषण तीव्र होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले असून आपली भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “तुमच्या मनामध्ये आमच्या लेकरांच्या जेवणात विष कालवण्याचा विचार आहे. आम्हाला फक्त आमचं आहे ते द्या. मागण्या सगळ्या मान्य करा. आणि तुम्ही दिल्या नाही करी हरकत नाही. दिल्या नाहीत तर आमच्यासमोर चित्र स्पष्ट होईल. आता हे उपोषण सुरु आहे. उपोषण आहे तो पर्यंत काही बोलणार नाही. उपोषण पूर्ण होऊ द्या. पण मग त्याच्यानंतर त्यांचा आणि आपला सामना लागेल,” अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला होता. मात्र आता मुख्यमंत्री बदलले आहेत. यावर जरांगे पाटील म्हणाले की, “त्यावेळेस तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना करु दिलं जात नव्हतं. आता सगळं यांच्याकडे आहे. ते होते तेव्हा त्यांनी काही दिलं आता राहिलं आहे ते तुम्ही द्या. शिंदे चांगले आणि फडणवीस वाईट असं म्हणण्यापेक्षा आता राहिलं आहे ते देऊन टाका. त्यांनी नाही दिलं तर तुम्ही द्या. बघू आता कोण काय देत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात येणारच आहे,” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण कधी संपेल याबाबत देखील माध्यमांनी त्यांना प्रश्न केला. याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे उपोषण अर्धे राहिल असे बोलले होते. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, “त्यांना नाही कळणार. त्यांना उपोषण म्हणजे काय असतं हे नाही कळणार. त्यांना लोकांच्या भावना नाही कळणार. गरिबांच्या भावना, उपोषण, आंदोलन कधी थांबवायचं आणि कोणत्या टप्प्यावर नाही थांबवायचं हे त्यांना कळणार नाही. यांना राखरांगोळी करुन घेण्याची सवय लागली आहे. समाजाला काय आणि कधी द्यायचं हे त्यांना कळायचं नाही. समाजाच्या पदरात कसं पाडून घ्यायचं हे माझ्या मनात असतं. म्हणून मागील 75 वर्षात कधी न मिळणार आरक्षण मी गोरगरिबांच्या पदरात टाकलं आहे. आता हे उपोषण कसं होणार हे सगळ्यांना कळणार आहे,” अशा भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच राज्यात इतर ठिकाणी आंदोलन करु नये असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

Web Title: Manoj jarange patil on hunger strike for maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
3

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा
4

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.