पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (फोटो- सोशल मीडिया)
पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना नोटिस
सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला प्रश्न
आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई
मुंबई: चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या औद्योगिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर विविध उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य अभिजीत वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रदूषण कमी करण्यासाठी तांत्रिक सुधारणा, धूळ नियंत्रण, स्वच्छता उपाययोजना आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यावर शासनाचा भर आहे. चंद्रपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी स्वतः भेट देणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नियमित पाहणी करण्यात येत असून, पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई केली जाते.
“पर्यावरण संवर्धन हे…” ; Mumbai Climate Week दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंचे भाष्य
मंडळाकडून उद्योगांची वेळोवेळी तपासणी करून पर्यावरणीय नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी केली जाते. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. तसेच आवश्यकतेनुसार अंतरिम निर्देश व प्रस्तावित निर्देश जारी करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री पंकजा मुंडेंचे भाष्य
राज्य शासन स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मुंबई क्लायमेट वीकदरम्यान आयोजित अर्थशॉट प्राईज उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी अर्थशॉट प्राइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन नॉफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी उपस्थित होते.
“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?
जगप्रसिद्ध ‘द अर्थशॉट प्राइज’ या जागतिक पर्यावरणीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नोव्हेंबर 2026 मध्ये मुंबईत होणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली. भारतात प्रथमच अर्थ शॉट प्राईज उपक्रम होत असल्याचा आनंद व्यक्त करत पर्यावरण मंत्री मुंडे यांनी या आयोजनासाठी सर्व सहभागी व आयोजकांचे आभार मानले. मंत्री मुंडे म्हणाल्या, अर्थशॉट उपक्रमाने स्वच्छ हवा, कचरामुक्त जग, निसर्ग संवर्धन, सागरी परिसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि हवामान सुधारणा या पाच महत्त्वाच्या उद्दिष्टांना प्राधान्य दिले आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आणि स्वच्छ माती या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास पर्यावरणाचे नैसर्गिक संरक्षण होते.






