
महापौर बंगल्यावरून रणकंदन! २.३९ कोटींच्या प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) परिसरातील ऐतिहासिक महापौर बंगल्याच्या दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाचा मुद्दा सध्या मुंबईच्या राजकारणात वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे.या कामासाठी २.३९ कोटी रुपयांचा प्रस्ताव समोर आल्यानंतर, पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या जात असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीपुढे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, राणीबाग परिसरातील सागवान लाकडाचा हा एकमजली वारसास्थळ बंगला नूतनीकरणासाठी निवडण्यात आला आहे. या प्रस्तावात अंतर्गत सजावट, स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण, अतिरिक्त शयनकक्ष व प्रसाधनगृहांची उभारणी, आणि मुख्य सभागृहाचे एका सुसज्ज बैठकीच्या कक्षात रूपांतर करणे यांचा समावेश आहे.(फोटो सौजन्य – AI)
तसेच, बंगल्याच्या तळमजल्यावर इटालियन मार्बल बसविणे आणि विशेष प्रकाशयोजना करणे यांसारख्या आलिशान कामांसाठी २०२६-२७ च्या भांडवली अर्थसंकल्पातून तरतूद करण्यात आली आहे.महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचा हा वाद आता केवळ प्रशासकीय न राहता राजकीय प्रतिष्ठेचा बनला आहे. एकीकडे वारसा जतन आणि पैशांचा अपव्यय असे मुद्दे विरोधक मांडत असताना, दुसरीकडे वास्तूची सुरक्षा आणि महापौरांची सोय यावर सत्ताधारी ठाम आहेत. या प्रस्तावावर स्थायी समितीत काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रस्तावावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनावर कडाडून टीका केली आहे. श्महापौरांचा बंगला ही एक ऐतिहासिक वारसा वास्तू आहे. अशा वास्तूत मोठ्या प्रमाणावर तोडफोड करणे आणि मूळ रचनेत बदल करणे है वारसा जतन करण्याच्या तत्त्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे. असे त्यांनी म्हटले.निवडणुकीपूर्वीच या बंगल्याच्या डागडुजीवर दीड ते दोन कोटी रुपये खर्च झाले असताना, पुन्हा काही महिन्यातच कोट्यवधींचा प्रस्ताव कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, महापौरांना भेटायला येणाऱ्या नागरिकांना आणि पत्रकारांना बंगल्याबाहेर कंटेनरमध्ये बसावे लागणार असल्याचा दावा करत, त्यांनी मुंबईकरांच्या कराच्या पैशांची ही उधळपट्टी असल्याचे म्हटले आहे.
खड्ड्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळण! मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर वॉचडॉग फाऊंडेशनने ओढले ताशेरे
दुसरीकडे, सभागृह नेते गणेश खणकर यांनी या आरोपांचे खंडन करत बंगल्याच्या दुरवस्थेचे समर्थन केले आहे. खणकर यांनी सांगितले की, रमी स्वतः या बंगल्याची पाहणी केली असून वास्तू अत्यंत जीर्ण झाली आहे. लाकडाला वाळवी लागली असून फरश्या उखडल्या आहेत, खोल्यांचे आकारमान अत्यंत लहान असल्याने ते महापौरांना राहण्यायोग्य नाही. वारसास्थळाचे मूळ स्वरूप अबाधित राखूनच केवळ आवश्यक आधुनिकीकरण केले जात असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.