'देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील 'योग गुरु'! (Photo Credit- X)
या कार्यक्रमात दिव्याज फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या भावनेची आठवण करून दिली. “माझ्या आयुष्यातील लेडी लक म्हणजे माझी लाडकी मुलगी दिविजा,” या मुख्यमंत्र्यांच्या विधानातून व्यक्त होणारा जिव्हाळा आणि कुटुंबीय मूल्यांचा लोढा यांनी विशेष उल्लेख केला. त्या मूल्यांनाच अधोरेखित करत सौ. अमृता फडणवीस जी यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या दिव्याज फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी विविध क्षेत्रांत व्यापक व सातत्यपूर्ण कार्य राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिव्याज फाउंडेशनच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अभियान आणि आर्थिक स्वावलंबन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्य करण्यात येत आहे. समाजसेवा, क्रीडा, संगीत, योग आणि कौशल्य विकास यांचा समन्वय साधत सर्वांगीण विकासाचा आदर्श या संस्थेने उभा केला आहे.
योग : भारताचा प्राचीन, समृद्ध आणि गौरवशाली वारसा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जुहू बीच, मुंबई येथे 12व्या भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ‘योगा ऑन द बीच’ कार्यक्रम संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, योग ही भारताची अत्यंत… pic.twitter.com/aX8vagzQeN — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 21, 2026
यावर्षीच्या योग दिनाच्या कार्यक्रमात विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ७०० हून अधिक मुलांना सहभागी करून घेत, त्यांना सकारात्मकता, आत्मविश्वास आणि नव्या आयुष्याची दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “योग म्हणजे केवळ एक व्यायाम किंवा कार्यक्रम नाही, तर ती एक साधना आहे जी शरीर, मन आणि भविष्यास एकत्र जोडते. भारताने जगाला दिलेली ही अमूल्य परंपरा आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे, आणि याचे सर्वात मोठे श्रेय देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांना जाते. त्यांच्या पुढाकारामुळे योगाला जागतिक मान्यता मिळाली आणि भारताची सांस्कृतिक ओळख अधिक बळकट झाली आहे.”
ते पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘योग गुरु’ आहेत. त्यांनी राज्यात संतुलित आणि दूरदृष्टीने नेतृत्व करत विकासाचा मार्ग कायम ठेवला आहे. योगाच्या तत्वज्ञानाप्रमाणेच त्यांनीही राज्याच्या प्रगतीत संतुलन साधत महाराष्ट्राला पुढे नेले आहे.”
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. योग, ध्यान आणि प्रबोधनात्मक उपक्रमांद्वारे सर्वांनी निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल दिव्याज फाउंडेशनच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. विकसित महाराष्ट्राच्या दिशेने अशा उपक्रमांची निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शेतकरी कर्जमाफीत फक्त एकच अट ! मुख्यमंत्री फडणवीसांनी केला खुलासा…






