फोटो सौजन्य- सोशल मीडिया
अटीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, ‘एकाच अट टाकलेली आहे. ती विशेषतः महाराष्ट्रातली बँकिंग सिस्टीम आहे. त्यात आमच्या जिल्हा सहकारी बँका आहेत. त्या टिकल्या पाहिजेत यासाठी अट आहे. ज्यात त्यांना वारंवार कर्जमाफी मिळालेली आहे. त्यांच्याकरता यावेळेसही कर्जमाफी करणार आहेत. एका फिक्स रकमेपर्यंत माफी देणार आहोत. उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. नाहीतर आपली बँकिंग सिस्टीम उध्वस्त होईल,” असे ते म्हणाले.
“४० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. कर्जमाफीसाठी एक सबकमिटी बनवली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काही मंत्री त्यात आहेत. कर्जमाफी जशी पुढे जाईल, तश्या त्यातील अडचणी लक्षात येतील. त्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी या कमिटीला देण्यात आली आहे,” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “कुठल्याही निवडणुका समोर नसताना आम्ही हि कर्जमाफ़ी केली आहे. विरोधी पक्षाने ताकदीने कोणतीही मागणी केली नसताना शासनाने स्वतःहून हि कर्जमाफी केलेली आहे. आमच्या डोळ्यांसमोर राजकीय हेतू नाही. आपल्याला शेतकऱ्याला कसं सक्षम करता येईल हा उद्देश आहे. अन्यथा २०२९ ला निवडणुका आहेत, आम्ही २०२८ डिसेंबरला कर्जमाफी करू शकलो असतो, पण आम्ही तसं केलेलं नाही,” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका दिवसभरात १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; १३.८४ लाख रुपयांचा दंड वसूल






