फोटो सौजन्य - Social Media
निळंशार आकाश, सुंदर निसर्ग, स्वच्छ हवा या सगळ्या गोष्टी आता मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे. ज्या मुंबईत दूरपर्यंत फक्त नि फक्त धुक्याची चादर भासणारे प्रदूषण पसरले होते ते प्रदूषण आणि ती चादर आता गायब झाली आहे. इतकी स्वच्छ मुंबई पाहण्यासाठी मुंबईकर समुद्रकिनारी निघाले आहेत. वायू प्रदूषण इतक्या प्रमाणात कमी झाले आहे की हवेची AQI 100 च्या खाली गेली आहे. हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे.
हवेची गुणवत्ता सुधारण्या मागचे कारण काय?
मुंबईत हवेची गुणवत्ता सध्या AQI ८९वर आहे, जी सध्या मध्यम आहे. मुंबईत अनेक ठिकाणी खासकरून पवई, भांडुप आणि दक्षिण मुंबईत स्वच्छ आकाश आणि ताजी हवा अनुभवायला मिळाली. इतकेच नव्हे तर मुंबईकर हे दृश्य पाहण्यासाठी घराबाहेरही निघाले आहेत. व्हिडीओ बनवून इंस्टाग्रामवर भरभरून पोस्ट केले जात आहेत. मुंबईत असा चत्मकार होण्यामागचे कारण म्हणजे मुंबईतील १,००० हून अधिक नियमभंग करणाऱ्या बांधकामांवर करण्यात आलेली कारवाई होय. या कारवाईमुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका ने फेब्रुवारी महिन्यात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष मोहीम राबवत शहरातील १,०८२ ठिकाणी तपासणी केली. धूळ कमी करण्यासाठी १,४५४.०९ किमी रस्ते धुतले गेले, तर ६८४.८ किमी परिसरात मिस्टिंग करण्यात आले. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आधी १३५ बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या, तसेच ९३ ठिकाणी कामबंदीचे आदेश जारी करण्यात आले. या मोहिमेत केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे तर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही विशेष भर देण्यात आला, ज्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली.
पश्चिमेकडून येणाऱ्या अडथळ्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे आणि त्यामुळे मुंबई तसेच पश्चिम किनारपट्टीवरील अनेक शहरांचा AQI ढासळला असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, पण मुंबईमध्ये होणारा हा बदल फार सुखदायक आहे.
AQI म्हणजे काय?
हा एक मापक आहे जो आपल्याला सांगतो की हवा किती स्वच्छ किंवा किती प्रदूषित आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो. AQI म्हणजे “हवेची हेल्थ रिपोर्ट”. जसा जास्त AQI तसा जास्त प्रदूषण आणि जास्त आरोग्याचा धोका. मुंबईची हवा सध्या समाधानकारक आहे.






