करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभर देशभरातील लाखो भाविकांची शहरात गर्दी असते. यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय असते..श्री अंबाबाई दर्शनाला आलेल्या महिलांसाठी पागा बिल्डींगमध्ये स्वच्छतागृह आहे. पण ते अपुरे पडत असल्याने किमान दहा ते पंधरा मिनिटं महिलांना नंबरला थांबावं लागतं. शिवाय त्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने महिलांना आरोग्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो तर शहरातील ठिकठिकाणी उभारलेली स्वच्छतागृहे नादुरुस्त आहेत.त्यांची दुरुस्ती व दररोज त्याची स्वच्छता करणे प्रशासनाचे काम आहे. कोल्हापूर महापालिकेच्या महापौर आणि आयुक्त महिलाच आहेत.. त्यामुळे महिला स्वच्छता गृहांचा प्रश्न मार्गी लागेल ही अपेक्षा आहे..दरम्यान शहरातील स्वच्छतागृहांच्या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सुमोटो याचिका दाखल केली .महापालिका प्रशासनाला नोटीस काढून 14 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यानंतर आता पहिल्या टप्प्यात शहरातील रंकाळा ,लक्ष्मीपुरी दिपक वडा सेंटर, शाहू मैदान चौक आणि नागाळा पार्कातील एसटी वर्कशॉप परिसर या चार ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत.
करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभर देशभरातील लाखो भाविकांची शहरात गर्दी असते. यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय असते..श्री अंबाबाई दर्शनाला आलेल्या महिलांसाठी पागा बिल्डींगमध्ये स्वच्छतागृह आहे. पण ते अपुरे पडत असल्याने किमान दहा ते पंधरा मिनिटं महिलांना नंबरला थांबावं लागतं. शिवाय त्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने महिलांना आरोग्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो तर शहरातील ठिकठिकाणी उभारलेली स्वच्छतागृहे नादुरुस्त आहेत.त्यांची दुरुस्ती व दररोज त्याची स्वच्छता करणे प्रशासनाचे काम आहे. कोल्हापूर महापालिकेच्या महापौर आणि आयुक्त महिलाच आहेत.. त्यामुळे महिला स्वच्छता गृहांचा प्रश्न मार्गी लागेल ही अपेक्षा आहे..दरम्यान शहरातील स्वच्छतागृहांच्या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सुमोटो याचिका दाखल केली .महापालिका प्रशासनाला नोटीस काढून 14 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यानंतर आता पहिल्या टप्प्यात शहरातील रंकाळा ,लक्ष्मीपुरी दिपक वडा सेंटर, शाहू मैदान चौक आणि नागाळा पार्कातील एसटी वर्कशॉप परिसर या चार ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत.






