Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद
Mumbai Crime: मिरा रोडवर पुन्हा धारदार शस्त्राचा थरार; पाठलाग करून तरुणाला पकडलं अन्…
रूळ ओलांडण्याची बेफिकिरी संबंधित व्यक्तीचा जीव धोक्यात घालण्याबरोबरच लोकल वाहतुकीलाही फटका देते. अपघात झाल्यास संबंधित ठिकाणी लोकल थांबवावी लागते. त्यामुळे मागील गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होऊन हजारो प्रवाशांना विलंब सहन करावा लागतो. एका व्यक्तीच्या काही मिनिटांच्या घाईची किंमत हजारो प्रवाशांना वेळेच्या रूपाने मोजावी लागते. रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे दाखल आहेत.
शॉर्टकटचा अट्टहास ठरतोय जीवघेणा
पादचारी पूल, भुयारी मार्ग किंवा अधिकृत मार्ग उपलब्ध असतानाही काही प्रवासी बेट रुळांवर उतरतात. धावती लोकल काही सेकंदांवर असतानाही रूळ ओलाडण्याचा प्रयत्न केला जातो. हा निष्काळजीपणा क्षणात जीवघेणा ठरू शकतो. अपघात झाल्यास त्याची झळ संबंधित व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर लोकल सेवा विस्कळित होऊन हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसतो.
दंडाची भीतीही नाही
सात महिन्यांत ५,५३५ प्रकरणात दंडात्मक तर २,८७६ प्रकरणांत न्यायालयीन कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण ३८ लाख ८० हजार ६९७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जुलैमध्ये ४,५५० प्रकरणांपैकी तब्बल ४,५४९ प्रकरणांत दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर केवळ एका प्रकरणात न्यायालयीन कारवाई झाली. बेजबाबदार प्रवृतीला रोखू शकलेली नाही, है आकडेवारीवरून स्पष्ट होते.
Mumbai News: शतकाअखेर मुंबई जलमय होण्याचा धोका! BMC करणार किनारपट्टीचे सविस्तर नकाशांकन
जुलैमध्ये अचानक उसळी
जानेवारीत ४३८, फेब्रुवारीत ७९६, मार्चमध्ये ५६३. एप्रिलमध्ये ३१२ आणि मेमध्ये ३४५ प्रकरणे नोदली गेली. जूनमध्ये हा आकडा १,४०७ वर पोहोचला, मात्र जुलैमध्ये रूळ ओलांडण्याच्या प्रकरणांनी अचानक उसळी घेत थेट ४,५५० चा टप्पा गाठला. सात महिन्यातील एकूण प्रकरणांपैकी तब्बल ५४ टक्के प्रकरणे एकट्या जुलैमध्ये नोंदली गेली.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






