• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nagpur »
  • Congress Vijay Wadettiwar Apologizes On Controversial Statement Pahalgam Attack Victim

पीडित कुटुंबांना वेदना झाला असेल तर मी माफी मागतो…; पहलगामच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत विजय वडेट्टीवारांची माफी

कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाबत वादग्रस्त विधान केले. यानंतर जोरदार टीका झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी माफी मागितली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 29, 2025 | 12:51 PM
Congress Vijay wadettiwar apologizes on controversial statement Pahalgam attack victim

पहलगाम हल्ल्यातील पीडित यांच्या वादग्रस्त विधानानंतर विजय वडेट्टीवार यांची माफी (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नागपूर : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण देशातून रोष व्यक्त केला जात आहे. पहलगाममधील पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र पर्यटकांना धर्म विचारण्यात आल्याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला. वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. भाजप नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यावरुन जोरदार राजकीय टीका झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी माफी मागितली आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “नितेश राणे यांनी काय म्हटलं त्याकडे मला लक्ष देण्याची गरज नाही. काल मी जे बोललो ते तोडून मोडून दाखविण्यात आलं. भारताला आपापसात लढविण्याचा षडयंत्र पाकिस्तानने रचलं आहे. पहिल्यांदा दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. सरकार आपलं अपयश लपविण्यासाठी माझं वक्तव्य तोडमोड करून दाखविले गेले. माझं वक्तव्य मागून पुढून न दाखविता तोडून मोडून दाखवण्यात आलं,” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

विजय वडेट्टीवार यांनी टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना देखील प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “देशांमध्ये कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला आमची भूमिका स्पष्ट आहे मल्लिकार्जुन खर्गे यांनी जी भूमिका मांडली ती आमच्या पक्षाची भूमिका आहे. मी काल बोललो की अतिरेक्यांना पहिल्यांदा एवढा वेळ मिळाला त्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. तेवढेच दाखविण्यात आला माझी चॅनलला विनंती आहे माझं पूर्ण वक्तव्य दाखवा. देशाच्या सर्वभौमतेला, अखंडतेला खिंडार पाडण्यात त्यांना यश मिळवायचं होतं त्यामुळे त्यांनी असा कट रचला. अतिरेक्याला कुठला धर्म नसतो असं मी बोललो हा भारताला कमजोर करण्याचा हल्ला होता,” असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

पहलगाम हल्ल्याबाबत बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. “ते म्हणाले की, 26 वर्षानंतर पर्यटकांवर झालेला हल्ला आहे. हे अपयश लपविण्यासाठी माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं. ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला माझ्या बोलण्याने त्यांच्या भावना दुखावल्या असतील कुटुंबांना वेदना झाल्या असेल तर मी माफी मागतो. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, माझी भूमिका स्पष्ट आहे. अमित शाह येऊन गेले. पण तोडगा निघाला नाही तीन तिघाडा काम बिघाडा सुरू आहे. परस्पराविरोधात वक्तव्य केली जात आहे सरकार म्हणून महाराष्ट्रात एकत्रित काम करताना दिसत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना जनतेशी काही देणंघेणं नाही त्यांना सत्ता खुर्चीसाठी भांडण आहेत आणि त्यासाठी ते भांडत आहे,” असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे.

काय म्हणाले होते वडेट्टीवार? 

वडेट्टीवार म्हणाले की, “हे लोक (सत्ताधारी) नेहमी भारत-पाकिस्तान असा जप करत असतात. त्यांनी आता सांगावं की या हल्ल्याची जबाबदारी कोणाची? हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश असल्याचं सरकारने स्वीकारावं. हे लोक काय बोलतात तर त्यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना मारले. अरे मुळात यासाठी वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जाऊन त्याच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला वेळ असतो का? यावरून बरेच वाद आहेत काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला, तर काहीजण म्हणत आहेत की असं काह घडलं नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किवा त्याची कुठलीही जात नसते,” असे मत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले होते. यावरुन राजकीय वाद निर्माण झाला होता.

Web Title: Congress vijay wadettiwar apologizes on controversial statement pahalgam attack victim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • Jammu Kashmir Terror Attack
  • Pahalgam Terrorist Attack
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

काँग्रेस नेते वडेट्टीवारांचे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केलं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण
1

काँग्रेस नेते वडेट्टीवारांचे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केलं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण

भाजपकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे, ओबीसींनाच ओपनमध्ये येण्याचे आवाहन करणार; विजय वडेट्टीवार यांचं विधान
2

भाजपकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे, ओबीसींनाच ओपनमध्ये येण्याचे आवाहन करणार; विजय वडेट्टीवार यांचं विधान

भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणले, मतचोरांना आता…; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
3

भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणले, मतचोरांना आता…; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे
4

JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.