पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा 'तो' बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर (संग्रहित फोटो)
पाचगणी : जावळी तालुक्यात गाजलेल्या कथित अपहरण प्रकरणाची खरी कथा अखेर समोर आली आहे. मेढा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत तपास पूर्ण करत हे अपहरण नसून भीतीपोटी रचलेला बनाव असल्याचे स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील एका तरुणीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या मित्रासोबत पाचगणी येथे फिरायला जाताना अपघात झाला. गाडी घसरून पडल्याने दुखापत झाल्यानंतर घरी काय सांगायचे या भीतीने तिने थेट पुणे गाठले. त्यानंतर कुटुंबीयांना फोन करून अपहरणाची खोटी माहिती दिली. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. मात्र, सखोल तपासादरम्यान संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला.
या प्रकरणाबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितले की, तरुणीचे कोणतेही अपहरण झाले नसून, हा किडनॅपिंगचा बनाव होता. मेढा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. पोलिसांकडून आता याप्रकरणाचा तपास केला जात आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
बारावीची परीक्षा देणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याचे समोर आले होते. पीडित मुलगी एक्स्ट्रा क्लाससाठी जात होती तेव्हा हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराकडून तिने लिफ्ट घेतली. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यांनतर ती पुण्यात असल्याचे लक्षात आले. तिने स्थानिकाच्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यांनतर ती सुखरूप घरी परतली. मात्र, पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या तरुणीचे अपहरण झाले नसल्याचे समोर आले आहे.
हेदेखील वाचा : Satara Crime: सातारा धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थिनीचं गुंगीचं औषध देऊन अपहरण; शुद्धीवर आली तेव्हा पुणेत
अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या
दुसऱ्या एका घटनेत, एका २७ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून नदीत आणि शेततळ्यात फेकून दिले. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सतीश उर्फ आप्पा दादासो दडस (२७) असे आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमंथळी गावात घडली आहे. या घटनेने नागरिकांनाच नाही तर पोलिसांनाही धक्का बसला आहे.






