मुंबई : सध्या राज्यात राजकीय घडामोडी अतिशय वेगाने घडत आहेत. रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत, अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत सगळ्यानाच उत्सुकता आहे. दरम्यान, आता शिंदे गटात जोरदार धुसफूस असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रीपद मिळत नसल्यामुळं शिंदे गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यामुळं बैठकांचं सत्र सुरु आहे. (Shinde-Fadnavis Meeting)
शिंदे-फडणवीसांत रात्री सव्वा दोन तास बैठक…
बैठकीत काय घडले…
सध्या राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, काहीही घडू शकते असं बोललं जातंय. दरम्यान, काल रात्री उशिरा शिंदे-फडणवीस यांच्यात देखील बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत शिंदे गटातील नाराज आमदार, मंत्रिमंडळ विस्तार आणि शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपद मिळणार की नाही, याविषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाला दिलास दिला आहे. अजित पवार येण्याण काही फरक पडणार नाही. तुम्हाला मंत्रिपद दिली जातील, असा विश्वास फडणवीसांनी बैठकीत दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार का, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.