चटपटीत पाणीपुरी विक्री ठिकाणी साप..., अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उघड्यावर ठेवलेले साहित्य, स्वच्छतेचा अभाव, पाण्याची गुणवत्ता आणि अन्न हाताळण्याची पद्धत यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर “रस्त्यावरील पाणीपुरी खाणे खरंच सुरक्षित आहे का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने अशा पाणीपुरी विक्री ठिकाणांची तात्काळ तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, तसेच विक्रेत्यांना स्वच्छतेबाबत कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, नागरिकांनीही रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाताना स्वच्छता, पाणी आणि परिसराची स्थिती पाहूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
तामिळनाडूचे कृषीमंत्री एम.आर.के. पनीरसेल्वम यांच्या विधानामुळे निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. मंत्र्यांनी सांगितले की उत्तर भारतातून येणाऱ्या लोकांना फक्त हिंदी येते आणि त्यामुळे तामिळनाडूमध्ये बांधकाम मजूर किंवा पाणीपुरी विकणे यासारख्या मर्यादित रोजगाराच्या संधी आहेत. याउलट, राज्याच्या द्विभाषिक धोरणामुळे (तमिळ आणि इंग्रजी) तमिळ मुले परदेशात नोकऱ्या शोधत आहेत.
पनीरसेल्वम म्हणाले की आमची मुले परदेशात जात आहेत कारण आम्ही इंग्रजी शिकलो आणि त्यांना जागतिक संधी दिल्या. उत्तर भारतीयांना फक्त हिंदी येते, म्हणून त्यांच्यासाठी येथे रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) ने मंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आणि उत्तर भारतीयांचा किंवा त्यांच्या रोजगाराचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता असे स्पष्ट केले.






