
शाळा प्रवेशावर संकट! जन्म दाखले न मिळाल्याने बालकांचे शिक्षण धोक्यात; रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागावर अनास्थेचा आरोप
शाळा प्रवेशावर संकट!
जन्म दाखले न मिळाल्याने बालकांचे शिक्षण धोक्यात
जिल्हा परिषद आरोग्य विभागावर अनास्थेचा आरोप
कर्जत : सध्या शाळा प्रवेशाचा हंगाम सुरू असून रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अनास्थेमुळे अनेकांना जन्माचे दाखले मिळेनासे झाले आहेत.जन्माचे दाखले मिळत नसल्याने अनेक बालकांचे शाळा प्रवेश रोखले गेले असून जिल्हा परिषदेच्या स उदासीन कारभारामुळे अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.दरम्यान,शासनाच्या जन्म मृत्य नोंदी करणाऱ्या पोर्टलमुळे अनेक बालकांचे शाळा प्रवेशाचे स्वप्न भंग होण्याची शक्यता असून शाळा प्रवेश देखील संकटात आले आहेत.
शासनाने 2020 रोजी जन्माला आलेल्या बाळांना त्याच ठिकाणी जन्माचा दाखला ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरी जन्म झाला असेल तर ग्रामपंचायत नगरपरिषद आणि महापालिका त्यांना जन्माचा दाखला देऊ शकते.मात्र एखाद्या सरकारी दवाखान्यात त्या बाळाचा जन्म झाला असेल तर मात्र त्या बालकाला त्याच सरकारी दवाखान्यातून जन्माचे दाखले देण्याचे नियोजन आहे.मागील सहा वर्षे होऊन देखील जन्म दाखला न मिळाल्यामुळे त्यांचे आधार कार्ड बनत नाही.यामुळे अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.या सर्व कार्य प्रणालीला जबाबदार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नेहरकर यांचेकडे या प्रश्नावर कोणतेही उत्तर नाही.
Karjat News : ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल
कर्जत तालुक्यातील राज्याच्या आरोग्य विभागाचे उपजिल्हा रुग्णालय कर्जत, ग्रामीण रुग्णालय कशेळे तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ, कळंब,खांडस,आंबिवली,कडाव,मोहिली या प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मलेल्या बाळाच्या नोंदी २०२१ पासून सुरू आहेत.मात्र या जन्म नोंदी ऑनलाइन पोर्टल वर नसल्यामुळे मुलांना त्या मिळत नाही, शिक्षणाचे भविष्य असल्याचे दिसून येत आहे. जन्म नोंदी न मिळाल्यामुळे त्या बालकांचे आधार कार्ड बनवणे शक्य होत नाही. आधार कार्ड नसल्यामुळे मुलांना अंगणवाडीमध्ये त्यांची नोंद केली जात नाही.कर्जत तालुक्यातील एकट्या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात २७ बालकांच्या यादीबद्दल संभ्रम असून त्यांना जन्माचे दाखले प्रशासन देई शकले नाही.तसेच तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालय तसेच कशेळे ग्रामीण रुग्णालय येथील यादी मोठी असून ही सर्व पालक आज आपल्या बालकाच्या जन्माच्या दाखल्यासाठी दारोदारी फिरत आहेत.अशा शेकडो बालकांना जन्म दाखले न मिळाल्यामुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
माझ्या मुलाला सहा वर्षे होऊन गेली अजून पर्यंत जन्म दाखला न मिळाला नाही.त्यामुळे माझ्या मुलाला मला शाळेत टाकता येत नाही.ग्रामपंचायत नोंद करायला तयार नाही.त्यामुळे आधार कार्ड काढता येत नाही.शासनाच्या पोर्टल ची चुकीची शिक्षा माझ्या मुलाला मिळत आहे आणि शिक्षणापासून माझा मुलगा वंचित राहत आहे, अशी प्रतिक्रिया पालक हरिचंद्र भगत यांनी दिली.
Raigad News : धावत्या बसचं चाक निखळलं अन्… आगार व्यवस्थापकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ