
काजूच्या झाडाला गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या
पालवणी चेकपोस्ट परिसरातील घटना
आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट
मंडणगड: मंडणगड (वा.) तालुक्यातील (Ratnagiri News) पालवणी चेकपोस्ट परिसरात एका १८ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐश्वर्या किसन पवार असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मूळची कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील असलेली आणि सध्या पालवणी फाटा (मंडणगड) येथे राहणारी ऐश्वर्या किसन पवार (वय १८ वर्षे) ही १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरातून निघून गेलो होती.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास पालवणी चेकपोस्ट येथील बैठकीच्या हॉलच्या जवळ असलेल्या एका काजुच्या झाडाला तिने आपल्या ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. १८ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली. एवढ्या कमी वयात ऐश्वयनि हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मंडणगड पोलिस अधिक तपास करत आहेत.
Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?
आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
रत्नागिरी तालुक्यातील नातुंडे येथे कौटुंबिक वादातून आई आणि मुलाने एकाच वेळी गळफास घेतला. बुधवारी (दि. १८) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली, या दुर्घटनेत ३३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, ५८ वर्षीय आईची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. या घटनेमुळे पावस परिसरात खळबळ (Crime News) उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…
दत्ता मारुती पाटील (वय ३३. रा. नातुंडे) असे मृत तरुणाचे नाव असून, शारदा मारुती पाटील (क्य ५८) असे अत्यवस्थ असलेल्या मातेचे नाव आहे. दत्ता पाटील हा आपल्या आई, पत्नी आणि मुलांसह मुंबई येथे वास्तव्यास होता. त्याचे वडील मारुती पाटील नातुंडे येथील मूळ गावी एकटेच राहायचे. दोन दिवसांपूर्वी मारुती पाटील यांचे निधन झाले, त्यामुळे दत्ता आपल्या संपूर्ण कुटुंबासह अंत्यविधीसाठी गावी आला होता.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.