Vidhansabha 2024: हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.! निकालावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया
कणकवली (भगवान लोके): हरियाणामध्ये भाजपा विचाराचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आले आहे.हिंदू विचारांचा मुख्यमंत्री बसणार त्याला जनतेने कौल दिला आहे.हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.! असे सांगत हरियाणा राज्यातील भाजपच्या विजयानंतर भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे आनंद व्यक्त केला. प्रंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास ठेवला आहे.भाजप एकटा विरुद्ध इतर सर्व पक्ष अशी निवडणूक लढून यश मिळवले.मात्र काँग्रेस मित्र पक्षांची मदत घेऊन सुद्धा पराभूत झाली आहे. हरियाणाच्या निकालानंतर संजय राऊत यांना हाजमोलाच्या गोळ्या खाव्या लागतील अशी मिश्कील टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
संजय राऊत पहिल्यांदा मोठ्या बाता मारतात आणि पराभव झाला, की शेंबड्या मुलांसारखं रडतात अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. हरियाणा प्रमाणेच विकासाच्या अजेंड्यावर महायुतीचं सरकार महाराष्ट्रात जिंकणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूंचे खरे विरोधक मुसलमान नाही तर हिंदू आहेत असं सांगितलं होतं. काल तुतारीच्या व्यासपीठावरून शरद पवार यांच्या उपस्थितीत जानकर नावाच्या कार्ट्याने दीड दिवसाचा गणपती बाप्पा दारु पितो,अशा घाणेरड्या शब्दात आमच्या देवतांचा अपमान केला.त्यावेळी शरद पवार आणि तुतारीचे नेते गुदगुल्या झाल्यासारखे हसत होते. राष्ट्रवादी पवार गट मुस्लिम लीगचा बी पार्टनर झाला पक्ष आहे,अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
हिंदुत्ववादी बोललो तेव्हा नारायण राणे यांच्या चिरंजीवांच्या भाषा पटली नाही.आता हिंदू देव देवतांवर घाणेरडी टीका होते .तेव्हा ती भाषा तुम्हाला कशी पटते, असा सवाल यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.तुतारीवाल्यांचा हिंदू देवतांची अपमान करणं हाच ह्यांचा हाच मुख्य अजेंडा आहे का? हे स्पष्ट करावं,अशी टीका राणेंनी केली. तुतारीच्या व्यासपीठावर सगळे हिंदू असताना देवतांचा अपमान होतो आणि हे खुदू खुदु हसत होते. हे या लोकांना शोभणारे नाही असे त्यांनी सुनावले.
हेही वाचा- “आता हीच आघाडी कायम ठेवून संजय जगताप यांनी…”; मविआमधील ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य
महाराष्ट्र राज्यातील निवडणुकी नंतर ह्यांना आपण पाहिलात का? असं संजय राऊत यांचा फोटो लावून विचारावं लागेल. संजय राऊत यांनी किती ही ओरड घातली तरी ह्याच्या मालकाला काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा चेहरा करणार नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा न करण्याचे काँग्रेस अगोदर ठरलेलं आहे.त्यामुळे ठाकरे सरकार परत महाराष्ट्रात येणार नाही.घोडा मैदान लांब नाही. उबाठा शिवसेनेत हम दो हमारे दो असंच चित्र राहील असा टोला नितेश राणे यांनी लगावला.