• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thackeray Group Demands More Help For Cyclone Victims Kankavali Sindhudurg

चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना जास्त मदत मिळावी, ठाकरे गटाची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 18, 2024 | 11:54 AM
चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना जास्त मदत मिळावी, ठाकरे गटाची मागणी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कणकवली : कणकवलीत आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी हरकूळ बु. सरपंच बंडू ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य नित्यानंद चिंदरकर, हळवल ग्रामपंचायत सदस्य अनंत राणे, ग्रा. प सदस्य रोहित राणे उपस्थित होते. कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक, हळवल, कळसुली, शिरवल, साकेडी यांसह तालुक्यातील काही गावांमध्ये काल चक्रीवादळ होऊन ग्रामस्थांच्या राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले. हरकुळ बुद्रुकमध्ये ७५ घरांची छप्परे जमीनदोस्त झाली आहेत. प्रशासनाकडून त्याची पंचयादी घालण्याचे काम चालू आहे. यामध्ये ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून हरकूळ बु. सरपंच बंडू ठाकूर आणि मी स्वतः जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानापेक्षा जास्त नुकसान या अचानक आलेल्या चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे तौक्ते वादळ निकषांपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नुकसान भरपाईचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवू असे सांगितले. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आज नुकसान ग्रस्तांना घरपोच पत्रे आणि कौले मदत स्वरूपात दिले जाणार आहेत, अशी माहिती शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.

[read_also content=”हरकुळ बुद्रुक येथील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आमदार नितेश राणे https://www.navarashtra.com/maharashtra/mla-nitesh-rane-rushed-to-help-the-victims-of-harkul-budruk-sindhudurg-534527.html”]

सतीश सावंत पुढे म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी हरकूळ गावाला भेट देऊन पाहणी केली. जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. खासदार विनायक राऊत यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधला असून त्यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या प्रधान सचिवांकडे पाठपुरावा करून तौकते वादळापेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या चार पाच दिवसात शासनाने प्राथमिक स्वरूपात नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली आहे. अन्यथा जे जे लोक बाधित झालेत त्यांना घेऊन आम्हाला आंदोलन करावे लागेल. लोकांनी आपली घरे कर्जे घेऊन किंवा हात उसने पैसे घेऊन बांधली आहेत. नैसर्गिक आपत्तीत घरांचे नुकसान झाल्याने शासनाने सहानभूती पूर्वक विचार करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त ग्रामस्थांच्या वतीने आम्ही करत आहोत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सतीश सावंत यांनी सांगितले.

[read_also content=”पुण्यात शंभर रुपयांसाठी खून; पोलिसांकडून तरूणाला अटक https://www.navarashtra.com/maharashtra/murder-for-one-hundred-rupees-in-pune-the-youth-was-arrested-by-the-police-nrdm-534521.html”]

पुढे ते म्हणाले, आपल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी नुकसान ग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. महसुलची प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहून काम करत आहे. हरकूळमध्ये ८५ विद्युत पोल जमीन दोस्त झाले आहेत. महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची आम्ही भेट घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. महावितरणच्या आज ४ टीम हरकूळ गावात काम करत आहेत. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी आणि आम्ही सर्वानीच प्रशासकीय यंत्रणेला केलेल्या सूचनेनुसार सर्वच यंत्रणा योग्य प्रकारे हरकूळ गावात सहकार्य करत आहेत. इतर ठिकाणी देखील नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत त्या अधिकारी कर्मचारी यांचे सतीश सावंत यांनी आभार व्यक्त केले. या संकटाच्या काळात राजकारण न करता प्रत्येक राजकीय पक्षाची नुकसान ग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी आहे. जे जे कोणी मदत करतील त्यांचे आम्ही आभार मानतो असे सतीश सावंत यांनी सांगितले.

Web Title: Thackeray group demands more help for cyclone victims kankavali sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 18, 2024 | 11:54 AM

Topics:  

  • kankavali
  • Shivsena Thackeray Group

संबंधित बातम्या

Sindhudurg Crime : शहरात वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती; मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर
1

Sindhudurg Crime : शहरात वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती; मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

Sindhudurg News : “पुन्हा एकदा गणपती खड्डयांतून आणावे लागणार, विकासाच्या नावाखाली राणेंनी….”; परशुराम उपरकरांचा खोचक टोला
2

Sindhudurg News : “पुन्हा एकदा गणपती खड्डयांतून आणावे लागणार, विकासाच्या नावाखाली राणेंनी….”; परशुराम उपरकरांचा खोचक टोला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणाचा ऱ्हास करणारे अवैध मायनिंग खपवून घेणार नाही -स्टॅलिन दयानंद
3

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणाचा ऱ्हास करणारे अवैध मायनिंग खपवून घेणार नाही -स्टॅलिन दयानंद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.