• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The First Round Of Sant Tukobaraya Palkhi Ceremony At Belwadi Nrka

संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण बेलवाडीत

टाळमृदंगाच्या गजरात ज्ञानबा-तुकारामाचा जयघोष, तुतारीच्या निनादातही ग्यानबा तुकाराम जयघोष अशा वातावरणात या रिंगण सोहळ्याला सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला. सुरुवातीला बेलवाडी येथील अक्षय मचाले व अरुण वाघमोडे यांच्या मेंढ्यांचे गोल रिंगण संपन्न झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 30, 2022 | 03:25 PM
संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण बेलवाडीत
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे पहिले गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे मोठ्या उत्साहात (Ashadhi Wari 2022) पार पडले. टाळ मृदंगाचा गगनभेदी निनाद, वैष्णवांमध्ये संचारलेला उत्साह व भाविकांमध्ये रिंगण सोहळ्याची लागलेली उत्कंठा या भक्तीमय वातावरणात या नयनरम्य रिंगण सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

सणसर येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळ्याने बेलवाडीकडे प्रस्थान ठेवले. यानंतर जाचक वस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुशील पवार, उपसरपंच प्रकाश नेवसे, माजी उपसरपंच विक्रम निंबाळकर, पोलिस पाटील रेश्मा नेवसे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर बेलवाडीमध्ये पालखी सोहळा दाखल होताच ग्रामपंचायतीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर पालखी रिंगणस्थळी विसावली. दरवर्षी होणारा हा रिंगण सोहळा दोन वर्षानंतर प्रथमच होत असल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती. याची देही, याची डोळा! याप्रमाणे पालखी सोहळ्यातील हा नयनरम्य गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण परिसर वैष्णवांसह भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरून गेला होता.

टाळमृदंगाच्या गजरात ज्ञानबा-तुकारामाचा जयघोष, तुतारीच्या निनादातही ग्यानबा तुकाराम जयघोष अशा वातावरणात या रिंगण सोहळ्याला सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला. सुरुवातीला बेलवाडी येथील अक्षय मचाले व अरुण वाघमोडे यांच्या मेंढ्यांचे गोल रिंगण संपन्न झाले. यानंतर पताकाधारक वारकऱ्यांनी टाळमृदुंगाच्या गजरात आपली प्रदक्षिणा धावत पूर्ण केली. यामध्ये अनेक वृद्ध वारकरी देहभान विसरून धावत होते.

यानंतर तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन महिला वारकऱ्यांनी धावत प्रदक्षिणा पूर्ण केली. विणेकरी यांनी धावत प्रदक्षिणा पूर्ण केली. यानंतर अश्वाच्या गोल रिंगणास प्रारंभ झाला. प्रारंभी बाभूळगावकरांच्या अश्वाने धावण्यास सुरुवात केली. यापाठोपाठ मोहिते पाटलांचा अश्व धावला. दोन्ही अश्वांनी वायू वेगाने प्रदक्षिणा पूर्ण करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या अश्वांनी दौड पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पायाखालील रज आपल्या कपाळी लावण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली. यानंतर वैष्णवांचे या मैदानावर खेळ रंगले.

अनेक भाविकांनी वारकऱ्यांसोबत फुगड्यांचा आनंद लुटला. यामध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील फुगड्यांचा आनंद लुटला. टाळमृदंगाच्या गजरात पद्धतीने वारकऱ्यांनी धरलेला ठेका पाहून भाविकांनीही वारकऱ्यांसोबत हरिनामाचा गजर करत ठेका धरला. यानंतर आरती घेण्यात आली. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे,प्रसिद्ध उद्योजक अर्जुन देसाई, सरपंच माणिकराव जामदार, उपसरपंच अनिता खैरे, छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, शहाजी शिंदे, माजी सरपंच दादासाहेब गायकवाड, अनिल खैरे, सर्जेराव जामदार आदी उपस्थित होते.
यानंतर बेलवाडी गावातील हनुमान मंदिरात पालखी विसावली.

यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बेलवाडी परिसरातील ग्रामस्थांनी वारकऱ्यांची विविध पद्धतीने सेवा केली. यामध्ये अन्नदान, बिस्किट वाटप, पाणी वाटप आदींसह इतर उपक्रम राबविण्यात आले. दरम्यान, या पालखी सोहळ्यात अडीच लाखाहून अधिक वैष्णव व भाविक सहभागी झाल्याने पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह बाहेरील जिल्ह्यातून पोलीस कुमक बंदोबस्तासाठी मागविण्यात आली असून, यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बेलवाडीतील विसाव्यानंतर पालखी सोहळ्याने अंथूर्णे मुक्कामासाठी प्रस्थान ठेवले.

Web Title: The first round of sant tukobaraya palkhi ceremony at belwadi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2022 | 03:25 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2022

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Delhi Crime: मुलाचं अपहरण करून ब्लॅकमेल, लग्न आणि शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव

Delhi Crime: मुलाचं अपहरण करून ब्लॅकमेल, लग्न आणि शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव

मुलीपासून दूर राहण्यासाठी तरुणाला वारंवार बजावले; नंतर संतापलेल्या बापाने चाकूने…

मुलीपासून दूर राहण्यासाठी तरुणाला वारंवार बजावले; नंतर संतापलेल्या बापाने चाकूने…

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?

Defence Ministery: आता दारुगोळा, आता खासगी कंपन्यांही दारूगोळा अन् क्षेपणास्त्रे बनवणार! संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

Defence Ministery: आता दारुगोळा, आता खासगी कंपन्यांही दारूगोळा अन् क्षेपणास्त्रे बनवणार! संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

पाकिस्तान माझे जन्मस्थान आहे, पण भारत माझी मातृभूमी आहे… दानिश कनेरियाने का दिले स्पष्टीकरण?

पाकिस्तान माझे जन्मस्थान आहे, पण भारत माझी मातृभूमी आहे… दानिश कनेरियाने का दिले स्पष्टीकरण?

Bigg Boss 19: ‘वीकेंड का वार’ दरम्यान कोण जाणार घरा बाहेर? स्पर्धकांनी घेतले ‘या’ सदस्याचे नाव

Bigg Boss 19: ‘वीकेंड का वार’ दरम्यान कोण जाणार घरा बाहेर? स्पर्धकांनी घेतले ‘या’ सदस्याचे नाव

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.