
तू अनोळखी तरी सोबतीची गिरीजा ओक झाली फॅन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गिरीजाने शेअर केली आठवण
‘तू अनोळखी तरी सोबती’चा पहिला भाग पाहताना गिरीजा ओकला तिच्या आणि नवऱ्याच्या प्रेमकथेच्या आठवणी जाग्या झाल्या असल्याचं तिने सांगितलं. कामातून सुरू झालेली ओळख मैत्रीत आणि पुढे लग्नात बदलली. मालिकेतील समीर व अर्पिता यांची गोष्ट पुढे कशी जाणार हे पाहण्यासाठी गिरीजाही उत्सुक आहे. या मालिकेचं आणि गिरीजाचं एक खास कनेक्शन म्हणजे गिरिजाच्या सासऱ्यांनी लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी मालिकेचं शीर्षक गीत लिहिलं आहे. सध्या सर्वत्र या शीर्षक गीताची चर्चा सुरु आहे.
अंकिता वालावलकरही झाली व्यक्त
याचसह कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने ही तिच्या नवऱ्यासह मालिकेसंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अंकिता नेहमीच समाजकार्यचं आव्हान प्रेक्षकांना करायची. यामध्ये कुणाल नेहमी सामील व्हायचा. यानंतर दोघं एका अवॉर्ड फंक्शन मध्ये भेटले. पुढे जाऊन कुणालने अंकिताला लग्नाची मागणी घातली आणि त्यांचा अनोळखी प्रवास आयुष्यभरासाठी सुरु झाला. एकंदरीतच अनोळखी असणारी व्यक्ती पुढे जाऊन आयुष्यभराची सोबती कधी होऊन जाते कळतच नाही. मालिकेत अर्पिता आणि समीरचा अनोळखी ते सोबती पर्यंतचा प्रवास पाहणं रंजक ठरणार आहे. ‘तू अनोळखी तरी सोबती’ ही मालिका सन मराठीवर प्रेक्षकांना रोज पाहता येणार आहे.
Sun Marathi Serial: सावीसमोर येणार धैर्यचा खरा चेहरा? तर वैदहीच्या प्रेमासाठी तेजाची अनोखी परीक्षा
अंबर आणि योगिताची केमिस्ट्री
पहिल्यांदाच अंबर आणि योगिता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. दोघांनीही वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या कामाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे आणि आता यांची केमिस्ट्री काय कमाल दाखवणार आहे ही अनोळखी जोडी कशी सोबती होणार याचीच त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.