(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीत विमान अपघात निधन झाले आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आज सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमरास बारामतीत विमान लँडिंग करताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला.हा अपघात इतका भयानक होता, की विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. राजकीय क्षेत्रातून आणि कलाविश्वातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार करत होते. या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी बारामतीमध्ये गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शोक व्यक्त केला आहे.
मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने देखील अजित पवारांसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिले, ”मा. अजीत पवार सरांचं जाणं फार दूर्दैवी …
काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत ह्यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली कि , आधार वाटतो… त्यातले अजीतदादा पवार हे तसे आधार वाटायचे… आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटतं आहे… खूप त्रास होतोय… गंभिर प्रश्नांवर पण मिश्किल उत्तर देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलायची त्त्यांची शैली कमाल होती… त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले हि भावना मी समजू शकतो …अपघातात त्यांच्यासह प्राण गमवलेल्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो…अजित दादा… खूप आठवण येत राहील … अशी भावनिक पोस्ट अभिनेत्याने केली आहे.
“गरीबाला सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझा देव…”,अजित पवारांच्या निधनाने सूरज चव्हाण भावुक, भावनिक पोस्ट करत म्हणाला….
अजित पवार बारामतीला जात होते
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी पुणे जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात अजित पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांदरम्यान एका जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून बारामतीला जात होते. बारामतीजवळ उतरताना त्यांचे विमान कोसळले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.






