कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू जाते. हल्ली तरुण वयातील मुलामुलींमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या वाढताना दिसत आहे. शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर मेंदू आणि हृदयाचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. याशिवाय कोणत्याही वयात हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर या पेयांचे आवर्जून सेवन करावे. हेल्दी पेयांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतील. (फोटो सौजन्य – istock)
७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या 'हे' ड्रिंक

उपाशी पोटी दुधाचा चहा पिण्याऐवजी जास्वदींच्या फुलांपासून बनवलेला चहा प्यावा. या चहाच्या सेवनामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच जास्वदींच्या फुलांमध्ये असलेले अँथोसायनिन्ससारखे अँटिऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या सैल करतात.

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित ताज्या टोमॅटोचा रस प्यावा. यामध्ये असलेले विटामिन सी शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या डाळिंबाचा रस प्यायल्यास रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. डाळिंबाचा रस कधीही साखर न घालता बनवून प्यावा. यामुळे जास्त फायदे शरीराला होतात.

आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. काळा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी प्यावा. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत करते.

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित बीटचा रस प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर जाणून जाईल आणि आरोग्य सुधारेल. बीटचा रस प्यायल्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात.






