बऱ्याचदा घरात जेवणातील पदार्थ शिल्लक राहिल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवले जातात. फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्याची अनेकांना सवय असते. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून शिळे जेवण दुपारच्या वेळी खाल्ले जाते. फ्रिजमधील थंड जेवण बाहेर काढून ते गरम करून खाल्ले जाते. पहिल्यांदा गरम केलेला पदार्थ चवीला चांगला लागतो. मात्र वारंवार गरम करून खाल्ले पदार्थ शरीरावर गंभीर परिणाम करतात. हे आरोग्यासाठी अतिशय धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या भाज्या पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाज्या वारंवार गरम करून खाल्ल्यास आतड्यांमध्ये विषारी घटक तयार होऊन विषबाधा, पोटदुखी, जुलाब, ऍसिडिटी, उलट्या, गॅस इत्यादी समस्या उद्भवू शकतात. (फोटो सौजन्य – istock)
'या' भाज्या वारंवार गरम केल्यास आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

शिल्लक राहिलेली पालकची भाजी वारंवार गरम करून खाऊ नये. भाज्या गरम केल्यानंतर नायट्राइटमध्ये बदलतात. यामुळे मेथेमोग्लोबिनेमिया सारख्या गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. रक्त वाहून नेण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात.

फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या सतत गरम करून खाल्ल्यास चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या आणि लहान मुलांमध्ये ब्लू-स्किन सिंड्रोम इत्यादी गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

मशरूम शरीरासाठी अतिशय पौष्टीक मानला जातो. पण मशरूमची भाजी सतत गरम करून खाल्ल्यास पोटात जडपणा, गॅस आणि उलट्या इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात.

बटाट्याची भाजी सतत गरम केल्यास टॉक्सिक कंपाऊंड्स तयार होतात, ज्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते.त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर केला असेल त्या भाज्या सतत गरम करू नये.

Untitled design (41)






