पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात अंजीरचा समावेश करावा. बाजारामध्ये ओले आणि सुकवलेले असे दोन्ही प्रकारचे अंजीर उपलब्ध आहेत. चवीला गोड असलेली अंजीर हे फळ सगळ्यांचं खूप आवडते. अंजीरमध्ये विटामिन ए, सी, ई, के, बी6, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज यांसारखे अनेक गुणकारी घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रोज १अंजीरचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला अंजीर खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
अंजीर खाण्याचे फायदे
अंजीर हे एक शक्तिशाली फळ असून गंभीर आजारांवर प्रभावी आहे. यामुळे बीपी नियंत्रणात राहून हृदयाचे आरोग्य सुधारते.
सतत मोबाईल किंवा लॅपटॉप बघून कमकुवत झालेली दृष्टी सुधारण्यासाठी आहारात अंजीरचा समावेश करा. यमु;ए डोळ्यांची दृष्टी सुधारून डोळ्यांना त्रास होणार नाही.
अंजीर खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून निघून जातात. पचनसंबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी रोज अंजीर खावे.
अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येतात. यामुळे बद्धकोष्ठता दूर होऊन आतड्या स्वच्छ आणि निरोगी राहतात.
मानसिक आणि शारीरिक तणाव कमी करण्यासाठी अंजीर प्रभावी आहे. यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो. तसेच अंजीर खाल्ल्यामुळे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टळते.