सकाळी उठल्यानंतर संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जाण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. काहींना व्यायाम करण्याची सवय असते, तर काहींना हेल्दी पदार्थांचे सेवन करण्याची सवय असते. सकाळच्या नाश्त्यात खाल्लेले पदार्थ संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे सकाळी हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात होणारे छोटे मोठे बदल संपूर्ण आरोग्यावर कायमच परिणाम करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोणत्या पेयांचे सेवन केल्यास शरीरात उत्साह आणि ऊर्जा टिकून राहील, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
संपूर्ण दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहण्यासाठी आवर्जून करा 'या' पेयांचे सेवन

दिवसाची सुरुवात नारळ पाण्याने केल्यास कायमच तुम्ही फ्रेश राहाल. यामध्ये कॅल्शियम , मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. नारळ पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते.

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे चयापचय वाढवण्यासाठी मदत करतात. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित सकाळी उपाशी पोटी ग्रीन टी प्यावा.

सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करण्याऐवजी हिरव्या भाज्यांच्या रसाने करावी. हिरव्या भाज्यांचा रस शरीरात वाढलेला थकवा आणि अशक्तपणा कमी करतात.

कोरफड केवळ त्वचेसाठीच नाही तर पोटासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे आयबीएस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोरफड रस प्यावा.

हँगओव्हर किंवा डिहायड्रेशनची समस्या वाढू लागल्यास टोमॅटोच्या रसाचे सेवन करावे. यामध्ये ९५ टक्के पाणी असते. टोमॅटोचा रस प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते.






