महाराष्ट्रात सध्या गुलाबी थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणात अनेक जण कुठे तरी लॉंग ट्रिपवर जाताना दिसतात. खरंतर थंडीचा महिना हा निसर्गाचे सुदर रूप अनुभवायचा एक क्षण आहे. हाच क्षण अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील असंख्य पर्यटक आपल्याला महाबळेश्वरला जाताना दिसतात. वाईच्या दात जंगलात असलेले महाबळेश्वर हिवाळ्यात पर्यटकांना खुणावत असते. चला जाणून घेऊया की गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी लोकांची पहिली पसंती महाबळेश्वरलाच का असते.
हिवाळ्यात फिरण्यासाठी महाबळेश्वरच भारी (फोटो सौजन्य: istock)
फळांचा आणि पदार्थांचा आनंद: हिवाळा हा महाबळेश्वरच्या ताज्या स्ट्रॉबेरीचा हंगाम आहे. याशिवाय, स्ट्रॉबेरी क्रश, क्रीम, आणि गरमागरम स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.
सर्वांत कमी गर्दी: उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्याच्या सुरवातीच्या मोसमात पर्यटकांची संख्या कमी असते. त्यामुळे निसर्गाचा शांतपणे अनुभव घेता येतो आणि ठिकाणेही खूप शांत वाटतात.
भटकंतीसाठी उत्तम वेळ: महाबळेश्वरमधील विविध पॉईंट्स, जसे की आर्थर सीट पॉईंट आणि वेण्णा लेक, या हिवाळ्यात अधिक सुंदर वाटतात. उन्हाच्या झळा नसल्यामुळे भटकंती अधिक आरामदायी होते.
दुर्मिळ धुक्याचा अनुभव: हिवाळ्यात महाबळेश्वरमध्ये पहाटे आणि रात्री धुक्याचा वेढा असतो. पर्वतांवरून दिसणारे धुके आणि दाट झाडीतून वाहणारे कुंद वारे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.
थंड आणि आल्हाददायक हवामान: हिवाळ्यात महाबळेश्वरचे तापमान १०-१५ अंशांपर्यंत खाली जाते, जे थंड आणि आल्हाददायक अनुभव देते. थंडगार वाऱ्यांमध्ये गवताच्या हिरव्यागार पठारांवर फिरण्याचा आनंद काही औरच असतो.