
Girish Mahajan Worli Protest, Mumbai Traffic Jam News, Women’s Reservation Bill Protest,
Mumbai News: संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक फेटाळण्यात आले. यानंतर भाजप या मुद्द्यावरुन चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईतील वरळी येथील जांबोरी मैदानाच्या परिसरात महिला आरक्षण विधेयकाविरोधातील आंदोलन सुरू होते, यात मंत्री गिरीश महाजन हेदेखील सहभागी झाले होते. त्यामुळे जवळपास एक तासाहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे संतप्त झालेल्या महिलेने थेट गिरीश महाजन यांच्याशी वाद घातला. ती महिला इतकी संतापली होती कि तिने पोलिसांनाही थेट प्रश्न विचारले. मैदान रिकामे असताना रस्त्यावर कार्यक्रम करण्यास परवानगी का दिली? असा सवाल तिने पोलिसांना केला. त्याचवेळी ने मंत्री गिरीश महाजन यांना तर ‘गेट आउट फ्रॉम हियर…’ अशा शब्दांत तिथून जाण्यास सांगितले. या संबंध प्रकरणावर आता गिरीष महाजन यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
11th admission process : अकरावीला प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा…; काय आहे अंतिम अंतिम
मंगळवारी महिला मोर्चादरम्यान घडलेल्या वादाच्या घटनेवर भाजप नेते Girish Mahajan यांनी प्रतिक्रिया दिली असून, संबंधित प्रकार दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका महिलेने मोर्चाच्या ठिकाणी येऊन संताप व्यक्त करत वाद घातल्याची घटना घडली. महाजन म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. काँग्रेसने या विधेयकाला विरोध केल्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला, त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची अडचण निर्माण झाली.”
या दरम्यान एक महिला घटनास्थळी आली आणि तिथे संतप्त प्रतिक्रीया दिली. याबाबत बोलताना महाजन म्हणाले की, “मी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना त्या समोर आल्या आणि ‘तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता?’ असा सवाल करू लागल्या. त्यांनी मैदानात जाऊन आंदोलन करण्यास सांगितले. पोलिसांनी त्या महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या आणि आक्षेपार्ह भाषेत बोलत होत्या,” असेही त्यांनी नमूद केले.
Shriram Finance च्या FD व्याजदरात बदल; 6 मेपासून नवे दर होणार लागू, पाहा किती मिळेल Return
आंदोलनाच्या ठिकाणी महिला पोलिसांचाही बंदोबस्त होता आणि सर्वांनी संयमाची भूमिका घेतली. मी स्वतः त्या महिलेला १० ते १५ मिनिटांत रस्ता मोकळा करू असे सांगितले होते, परंतु त्या तयार नव्हत्या,” असे त्यांनी नमुद केले. दरम्यान, संबंधित महिलेने पाण्याची बाटली उचलून मोर्चातील महिलांच्या दिशेने फेकल्याचा आरोपही महाजन यांनी केला. “अशा प्रकारे बाटली फेकणे निश्चितच अयोग्य आहे. हा मोर्चा महिलांच्या सन्मानासाठी होता,” असे त्यांनी ठामपणे म्हटले.भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन देत महाजन यांनी सांगितले की, मोर्चाचा मार्ग आधीच निश्चित करण्यात आला होता आणि त्यानुसारच आंदोलन पार पडत होते.