
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
विधान परिषदेच्या १७ जागांचे निकाल हाती आला आहेत. या १७ जागांवर झालेल्या निवडणूक सर्वात चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे नाशिक मतदार संघ. शिंदेंचा दाणून पराभव झालेला आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळे गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा पराभव केला आहे.
शिंदे गटात प्रवेशापूर्वीच ‘गेम’ झाला? Omraje Nimbalkar यांच्यामुळे भाजपचे बसवराज पाटील विजयी?
मतदार संघात निवडूकीच्या आधीपासूनच चांगलीच रणधुमाळी पाहायला मिलाली. नाशिक विधान परिषदेची महायुतीची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. तिथे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली. तिथे गिरीश महाजन समर्थक आणि भाजपचे नेते गणेश गिते यांच्यासह त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी अर्ज भरून बंडखोरी केली होती. त्यामुळे गणेश गिते यांनी मुदतीच्या आधी त्यांचा अर्ज मागे घेतला होता. मात्र गोकुळ गिते यांनी मुदत संपून पण अर्ज मागे घेतला नाही.
गोकुळ गिते यांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन, उदय सामंत तळ ठोकून राहिले. चर्चा केल्या डझनभरापेक्षा जास्त फेऱ्या झाल्या काही दिवस आधी त्यांनी प्रचार थांबवत असल्याचं जाहीरही केलं होतं. मात्र अर्ज मागे न घेतल्यामुळे त्यांच नाव मतपत्रिकेत कायम होतं. त्यांनी आपली छुपी रणनीती सुरु ठेवली आणि निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. गोकुळ गिते यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आणि जल्लोष करत विजय साजरा केला.
नाशिक विधान परिषदेवर निवडून आलेल्या गोकुळ गिते यांनी विजयानंतर आपली प्रतिक्रिया देत सांगितलं की, ” मी फक्त माझा प्रचार थांबवला होता. पण त्या उमेदवाराला मी पाठींबा देऊच शकत नव्हतो. माझी पहिल्या पासूनची भूमिका स्पष्ट होती. महायुतीचा घटक म्हणून गणेश भाऊंनी अर्ज मागे घेतला. दराडेंवर विश्वास टाकला होता. पण त्यांनी विश्वासघात केला त्यामुळे आज गोकुळ गिते आमदार झाले”. यावरुन महायुतीतील अंतर्गत कुरघोडी समोर आली आहे.
अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. या जागेसाठी एकूण ६१८ मते पडली होती, त्यापैकी १३ मते अवैध ठरवण्यात आली. ६०५ वैध मतांच्या आधारे ३०३ मतांचा विजय कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या फेरीत गोकुळ गीते यांना ३५७ मते मिळाली, तर महायुती-समर्थित उमेदवार नरेंद्र दराडे यांना २४८ मते मिळाली. तिसरे उमेदवार, प्रसाद हिरे यांना एकही मत मिळाले नाही. गोकुळ गीते यांनी आवश्यक कोटा ओलांडल्यामुळे मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीची आवश्यकता भासली नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना थेट विजेता घोषित केले. हा विजय शिंदे गट आणि महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे.