
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ठाकरे गटांत झालेला बंड आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसून आले आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम तो म्हणजे विधान परिषदेचा निकाल. सोमवारी राज्यातील विधानपरिषदेच्या 17 पैकी 11 जागांवरील निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यानिकालात एकतर्फी विजय हा महायुचीचा झालेला पहायला मिळाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धाराशिव- लातूर मतदारसंघात याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसला. हा मतदारसंघ खासदार ओमराजे निंबाळकरांचा आहे. फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विधान परिषद निवडणुकीत धाराशिव-लातूर मतदारसंघात महाविकास आघाडीला दगा दिल्याचे समोर आले आहे.
धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद मतदारसंघातून भाजपचे बसवराज पाटील रिंगणात उतरले होते तर काँग्रेसकडून महेश देशमुख विरोधात उभे होते. पण इथे वेगळीच खेळी पाहायला मिळाली. भाजपचे बसवराज पाटील यांचा विजयी झाला आहे. तर काँग्रेसच्या महेश देशमुख यांचा पराभव झाला. या निकालावर नजर टाकल्यास याठिकाणी महाविकास आघाडीची मतं फुटल्याचे स्पष्ट दिसत आहे. ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याची घोषणा केली खरी पण त्यांचा हा निर्णय अगोदरच झालेला असल्यचा दिसून येत आहे. कारण हा निकाल या सगळ्यासाठी महत्त्वाचा बाजू मांडून गेला. जरी त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं असलं की माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून मी शिंदे गटात जायचे की नाही, हा निर्णय घेईन पण इथे डाव वेगळाच निघाला आहे. 18 जूनला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधील आपली सर्व मतं भाजपच्या बसवराज पाटील यांच्याकडे वळवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार बसवराज पाटील यांना 845 मतं मिळाली आहेत. तर 14 मतपत्रिका कोऱ्या होत्या. 14 मतं बाद ठरली. काँग्रेसच्या महेश देशमुख यांना फक्त 124 मतं मिळाली. त्यामुळे भाजपच्या बसवराज पाटील यांचा 721 मतांनी दणदणीत विजय मिळाला. हा राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने झालेला विजय मानला जात आहे. ओमराजे निंबाळकर यांनी दगाफटका केल्यामुळे या निवडणुकीत मविआची तब्बल 150 मतं फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद निवडणुकीत बसवराज पाटील यांना 845 मतं मिळाली आहेत. 14 मतपत्रिका कोऱ्या होत्या. तर 14 मतं बाद ठरली. काँग्रेसच्या महेश देशमुख यांना फक्त 124 मतं मिळाली. त्यामुळे भाजपच्या बसवराज पाटील यांचा 721 मतांनी विजय झाला. हा राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने झालेला विजय आहे. ओमराजे निंबाळकर यांनी दगाफटका केल्यामुळे या निवडणुकीत मविआची तब्बल 150 मतं फुटल्याचा अंदाज आहे.
ओमराजे यांनी निधी हवा असेल तर आम्ही आमच्या किडन्या विकू, असा प्रकारचं भावनिक आवाहन तेथील शिवसैनिकांनी केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ओमराजे आमची शेवटची आशा असून त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये असंही मातोश्रीवरील वातावरण होतं. यासगळ्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील तसेच धाराशिव- लातूर विधानपरिषदेचे वारे फिरले असल्याचं समोर येत आहे.
ऑपरेशन टायगरला धक्का? ओमराजे-आष्टीकरांच्या घोषणेमुळे सहा खासदारांची सदस्यता धोक्यात